शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रामदास स्वामी यांनी देशसेवेला प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:42 IST

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.

ठळक मुद्देटाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमी

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.टाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रत्नपारखी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय, विश्वस्त प्राचार्य राम कुलकर्णी, सुधीर शिरवाडकर, भालचंद्र शौचे, कल्पेश महाराज भागवत, प्रकाश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. रत्नपारखी म्हणाले की,देशद्रोही यवनांना देशाबाहेर घालवावे यासाठी समर्थांनी जनजागृती केली. भारतीयांना स्वर्धमाचा अभिमान व राम नामाचे महत्व कळावे यासाठी मनाचे श्लोक रचले. टाकळीतील गोदा-नंदिनी काठी बारा वर्षे तपश्चर्या केली.येथेच त्यांना रामदर्शन झाले. या वास्तव्यात त्यांनी प्रचंड अध्ययन केले. शास्त्रीय संगीतासह विविध विषयांत ज्ञान मिळवले. नंतर त्यांनी देशभर भ्रमण करून प्रखर राष्ट्रभक्ती जागवली, असे प्रा. रत्नपारखी यांनी सांगितले.समर्थ आणि शिवाजी महाराज संबंधाबाबत राजकारण होत असल्याची खंत व्यक्त करून रत्नपारखी म्हणाले की, या दोघांच्या सुसंबंधाचे असंख्य पुरावे आहेत. समर्थांची जनजागृती स्वराज्यासाठी उपयुक्त ठरली. समर्थांनी महाराजांना महाराष्ट्र धर्म स्थापनेचे आवाहन केले. महाराजांनी समर्थांना सज्जनगड भेट दिला. ३५ दिवस महाराज या गडावर होते. असेही ते म्हणाले़