शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रमाई आवासचा अवघा एकच पूर्ण लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:08 IST

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे.

नाशिक : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संपूर्ण योजनेत ३३ कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यातील केवळ २१ लाभार्थींपर्यंत योजनेच्या  दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पोहोचले आहे. शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील गरिबांना त्यातही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाने रमाई आंबेडकर आवास योजना आखली आहे. ज्यांची स्वमालकीची झोपडी, कच्चे घर अथवा मोकळी जागा असेल त्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते.यासंदर्भात गेल्यावर्षी ७ जानेवारीस घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पात्र व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठीच नव्हे तर दुरु स्तीसाठी अडीच लाख रु पयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेकरिता शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले असले तरी लाभार्थी निश्चित करण्यास महापालिका वेळखाऊपणा करीत असल्याने लाभेच्छुकांना लाभ मिळत नाही. तसेच या योजनेचा लाभ संंबंधितांपर्यंत पोहण्यास अडथळे निर्माण होत आहेत.३३ कुटुंबांनाच लाभसदरची योजना सुरू झाल्यापासून जेमतेम ३३ कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे अनुदान या ३३ कुटुंबांना मिळाले आहे. मात्र, २१ लाभार्थ्यांनाच योजनेच्या दुसºया टप्प्यातील ८० हजार रु पयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेच्या उर्वरित २० हजारांच्या अनुदानाचा अंतिम टप्पा लाभार्थ्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर देणे असले तरी एकच लाभार्थी दाखला मिळवण्यापर्यंत पोहोचल्याने त्यालाच संपूर्ण अनुदानाचा पूर्ण लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Homeघर