शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:28 IST

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देशासनाचा निधी प्राप्त झाल्याने पर्यटन स्थळाचा विकास

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. राजदेरवाडी हे गाव वडबारे गावापासून १२ ते१५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्र्धेचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे.राजदेरवाडी किल्ल्यावर अनेक पर्यटक ट्रॅकिंगसाठी येतात. पर्यटकही सुटीच्या काळात येऊन मनमुराद आनंद लुटतात. शासनाच्या गड-किल्ले संवर्धन व विकास या कार्यक्र मांतर्गत पुरातनदुर्लक्षित असलेल्या राजदेर किल्ल्यावर संवर्धनाची कामे जात आहे. पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी ६० फुटाची शिडी होती. या जागेवर आता ३ फूट रु ंदीचा ७० फुटाचा जिना तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना सहज किल्ल्यावर पोहोचता येते. त्याचबरोबर गडावर येणारी पायवाट, गडवरील पाणीसाठ्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.गड-किल्ले विकास व संवर्धनासाठी शासनाच्या योजनेत राजदेर किल्ल्याचा समावेशकरून वनविभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे.यामध्ये किल्याचा विकास व संवर्धनासाठी कामाचा समावेश करण्यात आला. जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहे. यात ०.४५ बाय ०.६० मापाची ६०० मीटर सीसीटी खोदण्यात आली.येथील उपसरपंच मनोज शिंदे , आमदार डॉ.राहुल अहेर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन व उपवनसंरक्षक एम रामानुजम , जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप चौधरी यांच्याकडे किल्ल्याच्या विकासासंदर्भात मागणी केली होती.दगडीबांध ५००० घनमीटर, ५ गॅबियन बंधारे बांधण्यात आले, तर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तीन व किल्ल्यावरील ३ पाण्याच्या तळ्यांची खोली वाढवून व स्वच्छता करण्यात आली.किल्ल्यावर जाण्यासाठी ३२ चौरस मीटर जिना तयार करण्यात आला आहे. यामुळे अत्यंत दुर्लक्षित असलेला राजदेर किल्लाचा विकास होऊन पर्यटन वाढीसाठी मदत होणार आह.े यासाठी ३१ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन