शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

राजापूरला खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:04 IST

राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्यामुळे तारा एकमेकांना चिकटल्या कीवीजपुरवठ्याला व्यत्यय येतो. बऱ्याच वेळा तारा तुटतात. पण त्या तारा जोडण्यासाठी कर्मचारी वेळवर हजर नसतात. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ३१ मार्च रोजी दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती संबंधित अभियंत्याला दिल्यांनतर वीजपुरवठा सुरू झाला. १ एप्रिल रोजी दोन तास वीजपुरवठा खंडित झाला. लहीत फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नसल्याने तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. कर्मचाऱ्यांअभावी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असून त्यात वारंवार खंडित वीजपुरवठ्याची भर पडत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थात संताप व्यक्त होत आहे. येथील गावठाण हद्दीतील शनीमंदिराजवळील रोहित्र नेहमी जळत असतात. त्यामुळे बºयाच वेळेस गावातील काही भाग अंधारात राहतो. त्यामुळे वीजपुरवठा कधी असतो तर कधी नसतो. याकडे अधिकाºयांनी लक्ष देऊन वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज