शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
5
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
6
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

प्रिय राजबाबू,एकदा नाशिकला समाचारासाठी जाऊन यायला पाहिजे, असा विचार करता करता या विचार करण्यातच आपला बराच वेळ निघून गेलेला दिसतो. मागच्या वेळी म्हणे आपण येता येता राहूनच गेलात. हरकत नाही. पण समाचाराच्या बाबतीत सहसा हयगय करु नये, असे म्हणतात. पण आपण कोणाच्या म्हणण्या न म्हणण्याला आजवर कधीच धूप घातलेली नसल्याने, हे व्यावहारिक शहाणपणदेखील आपल्या बाबतीत कुचकामीच म्हणायचे!समाचाराचे आपल्या भाषेत दोन अर्थ निघतात हे मात्र आपण नक्कीच जाणत असणार. पण तितकंच कशाला, या दोन्ही अर्थांनी एकदा जाऊनच येऊ नाशकात, असाच आपला विचार असणार. आता एकाचवेळी दोन समाचार म्हणजे अंमळ जास्तीचा वेळ लागणारच की. तो जमवता जमवताच उशीर झाला ना? असो. पाच वर्षांपूर्वी ज्या गावानं आपले एकदम तीन शिलेदार विधानसभेत पाठवून दिले आणि अर्धशतकाहून अधिकचे मावळे पालिकेत निवडून दिले, त्या गावाविषयी आपल्या मनात ममत्वाची भावना राहणारच की! आणि ती आहे म्हणूनच मागच्या वेळच्या तीन शिलेदारांपैकी दोघानी सरळ आपटी खाल्ली तर तिसऱ्यानी रणांगणाला सामोरे जाण्याच्या आधीच चक्क पाठ दाखवली म्हटल्यावर भले कितीही वाघाचं असलं तरी काळीज फाटून जाणारच की नाही? या तिघातील, तिसऱ्याचं जरा बाजूला राहू द्या. तो कोणाचाच कधी झाला नाही, तर तुमचा काय होणार? तरीही त्यानी तुमच्या गळी उतरुन आपल्या उत्तराधिकाऱ्याची सोय करुन घेतली. यात त्याचं बेरकेपण सरस ठरलं की तुमचं ‘भोळेपण’ सरस, याचा शरद पवारीय भाषेत निकाल घेणं तसं कठीणच. पण उरलेल्या दोघांचं तसं नव्हतं. त्यांची सारी भिस्त तुमच्यावरच. त्यांनी आपला करिष्मा अगदी जवळून बघितलेला आणि अनुभवलेला असताना, त्यांचा तेजोभंग व्हावा व त्यांच्या अनामतेलाही कुर्बान व्हावं लागावं, यालाच आंग्ल भाषेत ‘इन्सल्ट टू इन्जुरी’ म्हणतात, ना राजबाबू? तेव्हां त्यांच्या सांत्वनासाठी येणं हा तुमच्या इटिनररीमधला पहिला समाचार!आपण एकेक मावळा अगदी निवडून निवडून घेतला, त्याच्यावर विश्वास टाकला, प्रत्येकातच आपण स्वत: राज ठाकरे बघितला आणि असे असताना या दोघांसकट आणखीही अनेकाना नाशिक जिल्ह्याने नाकारावं, यात कुठेतरी दगाफटका झाला असणार, या भावनेनं ओथंबून आणि दगाफटका करणाऱ्यांचा आता खरपूस घ्यावाच लागणार या मिषानं आपण आला असल्याने आपल्या अजेंड्यावरील हा दुसरा समाचार! होय की नाही?अर्थात, या दुसऱ्या समाचारप्रसंगी काय होणार वा काय होऊ शकतं याची चुणुक आपल्या परवाच्याच एका वक्तव्यावरुन दिसून आली होती. होर्डींग्ज लावले तर सरळ पक्षातून काढून टाकू, असा सज्जड दमच आपण देऊन टाकला. बहुधा या वक्तव्यामधूनच मुंबई उच्च न्यायालयाने प्रेरणा घेतली असावी? चांगलं आहे.आपण नाशकात अवतीर्ण झाल्यानंतर अगदी थेट प्रभागा प्रभागामध्ये जाऊन मावळ्यांची झडती घेणार असल्याचं आणि जे शिलेदार पराभवले त्यांना एकांतात बोलवून त्यांचा समाचार (पहिलावाला) घेणार असल्याचं ऐकिवात आहे. काय आहे, राजबाबू, आपण अखेर ठाकरे आहात, गर्दीचे आणि केवळ गर्दीचेच दर्दी आहात, तेव्हां प्रभागा प्रभागाचं राहू द्या, आख्ख्या नाशकातल्या साऱ्या मावळ्यांना एकझुंडीनं बोलावलं तरच कदाचित गर्दीचं दर्शन होईल असं आता नाशिककरांना उगाचंच वाटतं. ते खोटं ठरो, हीच मायभवानी जगदंबेच्या चरणी प्रार्थना!आता थोडं विषयांतर. तुमच्या स्वत:च्या तुमच्याच मावळ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. त्या असायलाही काही हरकत नाही. पण मग नाशिककरांनी तुमच्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या, त्यांचं काय करायचं? अर्थात या अपेक्षा तशा आपोआपच नाही वाढल्या. तुम्हीच त्या वाढवून ठेवल्या. आणि तसं म्हटलेलं कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण या अपेक्षांची पार माती झाली की हो? तेव्हां नाशिककरांनी कोणाचा समाचार (दुसरावाला) घ्यायचा? पण पूर्वानुभव लक्षात घेता, तो प्रश्न नाशिककरांनी अन्य कोणावरही न सोडता, स्वत:च स्वत: सोडवून घेतला. वाईट वाटून घेऊ नका, पण नाशिककरांनी तो असा काही सोडवला की, ज्याचं नाव ते आणि आपल्या सांप्रतच्या दौऱ्यांचं प्रयोजनदेखील तेच आहे ना? आपले कल्याण असो!- इति लेखनसीमा