शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

राज ठाकरे म्हणतात हा तर मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:39 IST

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते.

ठळक मुद्दे हनुमानाची जात हा काय चर्चेचा विषय होऊ शकतो?पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष

नाशिक- लोकांच्या संगणक, फोन व मोबाईलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय आहे. पाच राज्यातील निवडणूकीतील निकालानंतर आता जशजशा निवडणूका जवळ येतील तशा हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक मध्ये शनिवारी (दि.२२) शासकिय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष आहे. आता निवडणूका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल. इंटरनेट आणि मोबाईल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे. अशाप्रकारे तपासणी केलीच तर मोदी सरकारला लोकांनी शिव्या दिल्याचेच सापडेल असेही ते म्हणाले.नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत: साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रीया होती असे इतका वाईट निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती देखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.राज्यातील भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु त्याचा आता उपयोग नाही असे सांगत त्यांनी पाच राज्यातील सरकारपेक्षा महाराष्टÑात बत्तर हाल होतील असे ते म्हणाले.

शिवसेनेला राम आठवला आणि आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज यांनी आज सकाळीच कोणीतरी हनुमान चिनी होता असं म्हंटल्याचे ऐकलं. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल असे सांगत हे काय राजकारण्यांचे विषय झाले का असा प्रश्न केला आणि देशातील मुळ प्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा सुरू केल्या जातात.

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना