शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
5
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
6
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
7
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
8
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
9
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
10
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
11
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
12
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
13
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
14
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
15
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
16
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
17
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
18
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
19
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
20
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे म्हणतात हा तर मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:39 IST

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते.

ठळक मुद्दे हनुमानाची जात हा काय चर्चेचा विषय होऊ शकतो?पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष

नाशिक- लोकांच्या संगणक, फोन व मोबाईलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय आहे. पाच राज्यातील निवडणूकीतील निकालानंतर आता जशजशा निवडणूका जवळ येतील तशा हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक मध्ये शनिवारी (दि.२२) शासकिय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष आहे. आता निवडणूका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल. इंटरनेट आणि मोबाईल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे. अशाप्रकारे तपासणी केलीच तर मोदी सरकारला लोकांनी शिव्या दिल्याचेच सापडेल असेही ते म्हणाले.नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत: साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रीया होती असे इतका वाईट निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती देखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.राज्यातील भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु त्याचा आता उपयोग नाही असे सांगत त्यांनी पाच राज्यातील सरकारपेक्षा महाराष्टÑात बत्तर हाल होतील असे ते म्हणाले.

शिवसेनेला राम आठवला आणि आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज यांनी आज सकाळीच कोणीतरी हनुमान चिनी होता असं म्हंटल्याचे ऐकलं. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल असे सांगत हे काय राजकारण्यांचे विषय झाले का असा प्रश्न केला आणि देशातील मुळ प्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा सुरू केल्या जातात.

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना