शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राज ठाकरे म्हणतात हा तर मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:39 IST

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते.

ठळक मुद्दे हनुमानाची जात हा काय चर्चेचा विषय होऊ शकतो?पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष

नाशिक- लोकांच्या संगणक, फोन व मोबाईलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय आहे. पाच राज्यातील निवडणूकीतील निकालानंतर आता जशजशा निवडणूका जवळ येतील तशा हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक मध्ये शनिवारी (दि.२२) शासकिय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष आहे. आता निवडणूका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल. इंटरनेट आणि मोबाईल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे. अशाप्रकारे तपासणी केलीच तर मोदी सरकारला लोकांनी शिव्या दिल्याचेच सापडेल असेही ते म्हणाले.नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत: साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रीया होती असे इतका वाईट निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती देखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.राज्यातील भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु त्याचा आता उपयोग नाही असे सांगत त्यांनी पाच राज्यातील सरकारपेक्षा महाराष्टÑात बत्तर हाल होतील असे ते म्हणाले.

शिवसेनेला राम आठवला आणि आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज यांनी आज सकाळीच कोणीतरी हनुमान चिनी होता असं म्हंटल्याचे ऐकलं. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल असे सांगत हे काय राजकारण्यांचे विषय झाले का असा प्रश्न केला आणि देशातील मुळ प्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा सुरू केल्या जातात.

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना