शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गारपीटग्रस्त बागांचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावे राज ठाकरे : नव्या सरकारची परीक्षा

By admin | Updated: December 14, 2014 00:51 IST

गारपीटग्रस्त बागांचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावे राज ठाकरे : नव्या सरकारची परीक्षा

  नाशिक : जिल्'ात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे. मात्र मदत देताना नुकसानग्रस्त बागांचे पारदर्शकपणे पंचनामे व्हायला हवे, अन्यथा गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार नसून आलेला पैसा नेहमीप्रमाणे इतरांच्याच खिशात जाईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शहरातील गोदापार्कसह शिवाजी उद्यान व चिल्ड्रेन पार्कला भेट दिली. यावेळी गारपिटीमुळे जिल्'ातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता, त्यांनी सरकारी यंत्रणेवर निशाणा साधत पंचनामे पारदर्शकपणे होण्याची गरज असल्याचे सांगितले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी स्तरावरून मदत दिली जाते. मात्र थातूर-मातूर नुकसान दाखवून पंचनामे केले जात असल्याने गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नाही. यावेळेसदेखील हा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस जाहीर केले जातील, मात्र मदत त्यांच्यापर्यंत पोहचेलच याबाबत साशंकता आहे. नव्या सरकारची आता खऱ्या अर्थाने परीक्षा असून, त्यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असणार, असेही राज यांनी यावेळी सांगितले.