शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

गारपीटग्रस्त बागांचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावे राज ठाकरे : नव्या सरकारची परीक्षा

By admin | Updated: December 14, 2014 00:51 IST

गारपीटग्रस्त बागांचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावे राज ठाकरे : नव्या सरकारची परीक्षा

  नाशिक : जिल्'ात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे. मात्र मदत देताना नुकसानग्रस्त बागांचे पारदर्शकपणे पंचनामे व्हायला हवे, अन्यथा गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार नसून आलेला पैसा नेहमीप्रमाणे इतरांच्याच खिशात जाईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शहरातील गोदापार्कसह शिवाजी उद्यान व चिल्ड्रेन पार्कला भेट दिली. यावेळी गारपिटीमुळे जिल्'ातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता, त्यांनी सरकारी यंत्रणेवर निशाणा साधत पंचनामे पारदर्शकपणे होण्याची गरज असल्याचे सांगितले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी स्तरावरून मदत दिली जाते. मात्र थातूर-मातूर नुकसान दाखवून पंचनामे केले जात असल्याने गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नाही. यावेळेसदेखील हा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस जाहीर केले जातील, मात्र मदत त्यांच्यापर्यंत पोहचेलच याबाबत साशंकता आहे. नव्या सरकारची आता खऱ्या अर्थाने परीक्षा असून, त्यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असणार, असेही राज यांनी यावेळी सांगितले.