शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:37 IST

मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद पक्ष स्थापनेच्या वेळी पाठीमागे कोण होते?पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर

नाशिक : मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांनी गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉल येथे आयोजित मेळाव्यात पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज यांनी सांगितले, मला कुणी भेटायला येत नाही, परंतु जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा. महाराष्टÑात असे काम करा, की तुमचे फोटो झळकले पाहिजेत. तुमच्या जागी राज ठाकरे आहे, असे समजून जबाबदारी पार पाडा. पक्ष स्थापनेच्या वेळी माझ्या पाठीमागे कोण होते? परंतु, शिवतीर्थावरील सभेला तुम्ही लोक आला नसता तर माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लागला असता. अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिककरांना राज ठाकरे काय करत होता, याची जाणीव होत असेल.परत यायचे असेल तर...राज यांनी सांगितले, आता पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना परत यायचे आहे. परत यायचे म्हणजे ती काय बस आहे काय? एक हुकली की दुसरी. परत यायचेच असेल तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पुढील आठवड्यात पक्षाचे नेते नाशिकला येतील. त्यावेळी पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर दिला जाईल. गटाध्यक्षांपासून शाखाध्यक्षांपर्यंत नेमणुका केल्या जातील. जे बाहेर गेलेले ते तळाला जातील. मला कुणाची गरज नाही, असेही राज यांनी सुनावले.कुठे गेले नमोरुग्ण?राज यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले. भाजपाची वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती बघा. कुठे गेले नमोरुग्ण? एक एसएमएस टाकला की ते तुटून पडत होते. आता सिलिंडर, पेट्रोल महाग झाल्याने घरातूनच लाथा बसल्या. जे सांगितले त्याचे प्रत्यक्षात काय झाले? किती वेळ थापा मारणार, असे सांगत राज यांनी महापालिकेतील भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचे आदेश दिले.भविष्यात मी पक्ष काढेल, असे मला माहीत नव्हते. राजकारणात मी अपघाताने आलो. कॉलेजमध्ये असताना मला अमेरिकेतील वर्ल्ड स्टुडिओत जाऊन अ‍ॅनिमेटर व्हायचे होते. परंतु, त्यावेळी तेथे पोहोचण्याचे माध्यम नव्हते. तेथूनच राजकीय व्यंगचित्रकला सुरू केली. मनात राजकीय विचार करण्याची तयारी होतीच. पुढे जे घडत गेले ते तुम्हाला माहिती आहे, असेही राज यांनी सांगितले.