शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:37 IST

मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद पक्ष स्थापनेच्या वेळी पाठीमागे कोण होते?पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर

नाशिक : मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांनी गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉल येथे आयोजित मेळाव्यात पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज यांनी सांगितले, मला कुणी भेटायला येत नाही, परंतु जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा. महाराष्टÑात असे काम करा, की तुमचे फोटो झळकले पाहिजेत. तुमच्या जागी राज ठाकरे आहे, असे समजून जबाबदारी पार पाडा. पक्ष स्थापनेच्या वेळी माझ्या पाठीमागे कोण होते? परंतु, शिवतीर्थावरील सभेला तुम्ही लोक आला नसता तर माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लागला असता. अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिककरांना राज ठाकरे काय करत होता, याची जाणीव होत असेल.परत यायचे असेल तर...राज यांनी सांगितले, आता पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना परत यायचे आहे. परत यायचे म्हणजे ती काय बस आहे काय? एक हुकली की दुसरी. परत यायचेच असेल तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पुढील आठवड्यात पक्षाचे नेते नाशिकला येतील. त्यावेळी पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर दिला जाईल. गटाध्यक्षांपासून शाखाध्यक्षांपर्यंत नेमणुका केल्या जातील. जे बाहेर गेलेले ते तळाला जातील. मला कुणाची गरज नाही, असेही राज यांनी सुनावले.कुठे गेले नमोरुग्ण?राज यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले. भाजपाची वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती बघा. कुठे गेले नमोरुग्ण? एक एसएमएस टाकला की ते तुटून पडत होते. आता सिलिंडर, पेट्रोल महाग झाल्याने घरातूनच लाथा बसल्या. जे सांगितले त्याचे प्रत्यक्षात काय झाले? किती वेळ थापा मारणार, असे सांगत राज यांनी महापालिकेतील भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचे आदेश दिले.भविष्यात मी पक्ष काढेल, असे मला माहीत नव्हते. राजकारणात मी अपघाताने आलो. कॉलेजमध्ये असताना मला अमेरिकेतील वर्ल्ड स्टुडिओत जाऊन अ‍ॅनिमेटर व्हायचे होते. परंतु, त्यावेळी तेथे पोहोचण्याचे माध्यम नव्हते. तेथूनच राजकीय व्यंगचित्रकला सुरू केली. मनात राजकीय विचार करण्याची तयारी होतीच. पुढे जे घडत गेले ते तुम्हाला माहिती आहे, असेही राज यांनी सांगितले.