शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रायपूरला जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST

एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.

पाटोदा : एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.श्री संत मुरलीधर बाबा कातरणी पतसंस्थेचे वसुली अधिकारी अशोक बंदरे या जंगलातून जात असताना त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने येवला पोलीस ठाण्यात सदर घटना कळवत तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाची मागणी केली. तसेच आगीचे रौद्ररुप वाढत असल्याने त्याची माहिती स्थानिक परिसरातील नागरिकांनाही दिली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णत: विझवली. आग विझविण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तसेच पोत्याच्या वापर केला.आग विझल्यानंतर येवला व मनमाड नगरपालिकेचे फायर ब्रिग्रेडचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बंब उशिराने पोहोचण्याचा प्रकार यापूर्वीही घडल्याची खंत रायपूर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ यांनी व्यक्त केली.नुकत्याच लागवड केलेल्या जंगली झाडांना आगीपासून धोका होऊ नये यासाठी रायपूर येथील खंडेराव गुंजाळ ,मारु ती मोरे,बाळू सोनवणे,शिवाजी कदम ,वैभव कासव, अशोक बंदरे यांनी वनविभागाची कुमक येण्यापूर्वीच शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून अशी कामे निस्वार्थी भावनेतून करावी. याबाबत स्थानिकानी केलेल्या कामगिरीची प्रशंसा वनरक्षक एन.एस.बिन्नर यांनी केली.आग विझविण्यासाठी रायपूर येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार,विलास ताटपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.खंदारे,भास्कर डुकरे, नामदेव पवार, भारत वाघ,दयानंद कासव,अशोक शिंदे, अशोक आहेर,केदू वानखेडे, साहेबराव गांगुर्डे, मारु ती मोरे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :fireआग