शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पावसाच्या उघडिपीमुळे खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

ठळक मुद्देरब्बीची तयारी सुरू : पाच तालुक्यांमध्ये पेरण्या शिल्लक

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्यागतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढली असून, त्यांना पुरेशा पाण्याची वेळ आलेली असताना गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली आहेत. विशेष करून बाजरी, मका, भात व सोयाबीन या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत.जिल्ह्णात यंदा आॅगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून, गतवर्षाच्या तुलनेत ४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्यानाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यापैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.हेक्टर व टक्केवारीमालेगाव- ८५२७० (१३१.१४)बागलाण- ६७६२८ (१८३.५३)कळवण- ४३४९७ (७९.०१)देवळा- २५४२५ (९६.३५)नांदगाव- ६७७९६ (९५.३५)सुरगाणा- २०८०७ (६९.३१)नाशिक - १००८२ (६४.६७)त्र्यंबकेश्वर- २२७११ (१३६.०६)दिंडोरी- १८५९४ (१११.४०)इगतपुरी- २९७४३ (८४.२४)पेठ- १५७२२ (६४.०९)निफाड- २२२७८ (९०.०२)सिन्नर- ६५४९३ (१०५.९७)येवला- ७१३२४ (१४२.१७)चांदवड- ३७६६७ (८२.५७)