शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उघडिपीमुळे खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

ठळक मुद्देरब्बीची तयारी सुरू : पाच तालुक्यांमध्ये पेरण्या शिल्लक

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्यागतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढली असून, त्यांना पुरेशा पाण्याची वेळ आलेली असताना गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली आहेत. विशेष करून बाजरी, मका, भात व सोयाबीन या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत.जिल्ह्णात यंदा आॅगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून, गतवर्षाच्या तुलनेत ४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्यानाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यापैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.हेक्टर व टक्केवारीमालेगाव- ८५२७० (१३१.१४)बागलाण- ६७६२८ (१८३.५३)कळवण- ४३४९७ (७९.०१)देवळा- २५४२५ (९६.३५)नांदगाव- ६७७९६ (९५.३५)सुरगाणा- २०८०७ (६९.३१)नाशिक - १००८२ (६४.६७)त्र्यंबकेश्वर- २२७११ (१३६.०६)दिंडोरी- १८५९४ (१११.४०)इगतपुरी- २९७४३ (८४.२४)पेठ- १५७२२ (६४.०९)निफाड- २२२७८ (९०.०२)सिन्नर- ६५४९३ (१०५.९७)येवला- ७१३२४ (१४२.१७)चांदवड- ३७६६७ (८२.५७)