शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पावसाच्या उघडिपीमुळे खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

ठळक मुद्देरब्बीची तयारी सुरू : पाच तालुक्यांमध्ये पेरण्या शिल्लक

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्यागतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढली असून, त्यांना पुरेशा पाण्याची वेळ आलेली असताना गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली आहेत. विशेष करून बाजरी, मका, भात व सोयाबीन या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत.जिल्ह्णात यंदा आॅगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून, गतवर्षाच्या तुलनेत ४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्यानाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यापैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.हेक्टर व टक्केवारीमालेगाव- ८५२७० (१३१.१४)बागलाण- ६७६२८ (१८३.५३)कळवण- ४३४९७ (७९.०१)देवळा- २५४२५ (९६.३५)नांदगाव- ६७७९६ (९५.३५)सुरगाणा- २०८०७ (६९.३१)नाशिक - १००८२ (६४.६७)त्र्यंबकेश्वर- २२७११ (१३६.०६)दिंडोरी- १८५९४ (१११.४०)इगतपुरी- २९७४३ (८४.२४)पेठ- १५७२२ (६४.०९)निफाड- २२२७८ (९०.०२)सिन्नर- ६५४९३ (१०५.९७)येवला- ७१३२४ (१४२.१७)चांदवड- ३७६६७ (८२.५७)