शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उघडिपीमुळे खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

ठळक मुद्देरब्बीची तयारी सुरू : पाच तालुक्यांमध्ये पेरण्या शिल्लक

नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्याचा दावा कृषी विभागाने केला असून, पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित क्षेत्रावर रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्यागतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढली असून, त्यांना पुरेशा पाण्याची वेळ आलेली असताना गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली आहेत. विशेष करून बाजरी, मका, भात व सोयाबीन या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत.जिल्ह्णात यंदा आॅगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून, गतवर्षाच्या तुलनेत ४२ टक्के पाऊस नोंदविला गेला असला तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्यानाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यापैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.हेक्टर व टक्केवारीमालेगाव- ८५२७० (१३१.१४)बागलाण- ६७६२८ (१८३.५३)कळवण- ४३४९७ (७९.०१)देवळा- २५४२५ (९६.३५)नांदगाव- ६७७९६ (९५.३५)सुरगाणा- २०८०७ (६९.३१)नाशिक - १००८२ (६४.६७)त्र्यंबकेश्वर- २२७११ (१३६.०६)दिंडोरी- १८५९४ (१११.४०)इगतपुरी- २९७४३ (८४.२४)पेठ- १५७२२ (६४.०९)निफाड- २२२७८ (९०.०२)सिन्नर- ६५४९३ (१०५.९७)येवला- ७१३२४ (१४२.१७)चांदवड- ३७६६७ (८२.५७)