शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

येवल्यात पाऊस मनसोक्त बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:42 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्दे तीन तासांत तालक्यात ५४ मिलिमीटर पावसाची नोंदमानोरी परिसरात अजून एका दमदार पावसाची प्रतीक्षा

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.गेल्या सहा ते सात महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या येवला तालुक्यातील पश्चिम भागात कुणी पाणी देत का पाणी म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढवली होती. निमगाव मढ परिसरात हजारो क्विंटल कांदा पावसाने खराब झाला तर पिकांचे, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून निमगाव मढ, ब्राम्हणगाव परिसरात पावसाने रस्ता देखील या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे खचला आहे. दोन ते तीन तास चाललेल्या या पावसाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गत पंधरा दिवसापूर्वी येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आण ियाच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला शेतकऱ्यांनी सुरु वात केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उन्हाचा पारा वाढला होता दिवसरात्र केवळ जोराचा वारा सुटत होतापाऊस येतो की नाही याची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या पंधरा दिवसात शेतकरी वर्गाला गत वर्षीच्या आठवणी ताज्या होत यंदाही खरीप हंगामातील पिकांची लागवड उशिरा करावी लागणार की काय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली होती.शनिवारी झालेला पाऊस जोराचा होता खरा, पण त्याचे पाणी वावरात न थांबता मोठ्या प्रमाणात वाहून गेले असल्याने जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करावी की नाही अशी द्विधा मानोरी परिसरातील शेतकºयांना लागली आहे.रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरून वाहत होता तर गोई नदीतील मोठे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते. महिन्याभरापासून येवला तालुक्यात केवळ टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकरी वर्ग दिसून येत होता. मात्र या पावसामुळे येवला तालुक्यातील पश्चिम भागातील काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असून मका, सोयाबीन, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी वर्गाने कृषी केंद्रात गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.मानोरी, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अजून असाच एक मुसळधार पडल्यास हमखास खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीस शेतकरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि.२३) सकाळ पासूनच पुन्हा ढगाळ वातावरण होते. तसेच वाºयाचा वेग पूर्ण कमी झाल्याने दमट वातावरण होते आणि विशेष बाब म्हणजे रविवारी पूर्ण दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिले नव्हते.