शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

येवल्यात पाऊस मनसोक्त बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:42 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्दे तीन तासांत तालक्यात ५४ मिलिमीटर पावसाची नोंदमानोरी परिसरात अजून एका दमदार पावसाची प्रतीक्षा

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.गेल्या सहा ते सात महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या येवला तालुक्यातील पश्चिम भागात कुणी पाणी देत का पाणी म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढवली होती. निमगाव मढ परिसरात हजारो क्विंटल कांदा पावसाने खराब झाला तर पिकांचे, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून निमगाव मढ, ब्राम्हणगाव परिसरात पावसाने रस्ता देखील या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे खचला आहे. दोन ते तीन तास चाललेल्या या पावसाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गत पंधरा दिवसापूर्वी येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आण ियाच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला शेतकऱ्यांनी सुरु वात केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उन्हाचा पारा वाढला होता दिवसरात्र केवळ जोराचा वारा सुटत होतापाऊस येतो की नाही याची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या पंधरा दिवसात शेतकरी वर्गाला गत वर्षीच्या आठवणी ताज्या होत यंदाही खरीप हंगामातील पिकांची लागवड उशिरा करावी लागणार की काय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली होती.शनिवारी झालेला पाऊस जोराचा होता खरा, पण त्याचे पाणी वावरात न थांबता मोठ्या प्रमाणात वाहून गेले असल्याने जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करावी की नाही अशी द्विधा मानोरी परिसरातील शेतकºयांना लागली आहे.रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरून वाहत होता तर गोई नदीतील मोठे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते. महिन्याभरापासून येवला तालुक्यात केवळ टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकरी वर्ग दिसून येत होता. मात्र या पावसामुळे येवला तालुक्यातील पश्चिम भागातील काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असून मका, सोयाबीन, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी वर्गाने कृषी केंद्रात गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.मानोरी, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अजून असाच एक मुसळधार पडल्यास हमखास खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीस शेतकरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि.२३) सकाळ पासूनच पुन्हा ढगाळ वातावरण होते. तसेच वाºयाचा वेग पूर्ण कमी झाल्याने दमट वातावरण होते आणि विशेष बाब म्हणजे रविवारी पूर्ण दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिले नव्हते.