शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिंडोरी तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:13 IST

बळीराजा हवालदिल : भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान केल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून, या परिस्थितीतही खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येत आहे.सध्या दिंडोरी तालुक्यात वातावरणात कमालीचा बदल झाल्याने बळीराजांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण सध्या तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे पिकांना हमीभाव न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.---------------------------शेतकºयांनी मिळेल तेथून हात उसनवारी, कर्ज घेऊन पिके घेतली. मात्र पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहेत. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी खरीप हंगामाचे उद्दिष्टे पूर्ण केले; पिके ऐन बहरात असताना बळीराजाला अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागला. त्यात वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने शेतकºयांपुढील संकट वाढले आहे. (११ लखमापूर)

टॅग्स :Nashikनाशिक