शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

पाऊस ७८ टक्के, धरणात ७१ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे सलग तीन दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केले गेले. हवामान ...

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे सलग तीन दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केले गेले. हवामान खात्यानेही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. जून महिन्यातच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दीड महिना दडी मारली. जुलैच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातही खरिपाची पेरणी करावी लागली. पुन्हा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे यंदा जून ते सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात ७८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ९२ टक्क्यांवर होते. जवळपास १४ टक्के पाऊस यंदा कमी झाला असून, त्यामुळेच धरणातही जेमतेम पाणी साचले आहे.

नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या ७१ टक्के इतके जलसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा ९० टक्के इतका होता. सध्या सहा धरणे शंभर टक्के भरली असून, अन्य धरणांमध्ये सरासरी ७० टक्के साठा आहे. ज्या धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला. त्यात गौतमी गोदावरी, भावली, वालदेवी, हरणबारी, नाग्यासाक्या व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९४ टक्के इतका जलसाठा असून, समूहात ८८ टक्के इतका साठा आहे. दारणा व पालखेडमध्ये अनुक्रमे ९७ व ९३ टक्के जलसाठा आहे. मात्र दिंडोरीसह लगतच्या तालुक्यांची तहान भागविणाऱ्या ओझरखेडमध्ये अद्यापही ३५, तिसगावमध्ये १९, भोजापूरमध्ये २४ टक्केच पाणी आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ५४ टक्के जलसाठा आहे.

चौकट==

चार तालुक्यांनी टक्केवारी ओलांडली

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असताना मालेगाव, नांदगाव, देवळा व सिन्नर या दुष्काळी तालुक्यांची वाटचाल शंभर टक्क्यांहून पुढे गेली आहे. नांदगावी चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यात १३४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. तर त्या खालोखाल मालेगाव ११४ टक्के देवळा शंभर टक्के व सिन्नरची शंभरकडे वाटचाल सुरू झाली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यांना अद्याप सरासरी गाठता आलेली नाही.