शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

पाऊस ७८ टक्के, धरणात ७१ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे सलग तीन दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केले गेले. हवामान ...

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे सलग तीन दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केले गेले. हवामान खात्यानेही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. जून महिन्यातच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दीड महिना दडी मारली. जुलैच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातही खरिपाची पेरणी करावी लागली. पुन्हा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे यंदा जून ते सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात ७८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ९२ टक्क्यांवर होते. जवळपास १४ टक्के पाऊस यंदा कमी झाला असून, त्यामुळेच धरणातही जेमतेम पाणी साचले आहे.

नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या ७१ टक्के इतके जलसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा ९० टक्के इतका होता. सध्या सहा धरणे शंभर टक्के भरली असून, अन्य धरणांमध्ये सरासरी ७० टक्के साठा आहे. ज्या धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला. त्यात गौतमी गोदावरी, भावली, वालदेवी, हरणबारी, नाग्यासाक्या व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९४ टक्के इतका जलसाठा असून, समूहात ८८ टक्के इतका साठा आहे. दारणा व पालखेडमध्ये अनुक्रमे ९७ व ९३ टक्के जलसाठा आहे. मात्र दिंडोरीसह लगतच्या तालुक्यांची तहान भागविणाऱ्या ओझरखेडमध्ये अद्यापही ३५, तिसगावमध्ये १९, भोजापूरमध्ये २४ टक्केच पाणी आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ५४ टक्के जलसाठा आहे.

चौकट==

चार तालुक्यांनी टक्केवारी ओलांडली

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असताना मालेगाव, नांदगाव, देवळा व सिन्नर या दुष्काळी तालुक्यांची वाटचाल शंभर टक्क्यांहून पुढे गेली आहे. नांदगावी चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यात १३४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. तर त्या खालोखाल मालेगाव ११४ टक्के देवळा शंभर टक्के व सिन्नरची शंभरकडे वाटचाल सुरू झाली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यांना अद्याप सरासरी गाठता आलेली नाही.