शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावसह परिसरात संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:19 IST

मालेगाव : शहरासह तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देप्रशासन दक्ष : नदीकाठावरील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

मालेगाव : शहरासह तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.जुना मुंबई-आग्रा रोडवर जाफनगर भाग जलमय झाला आहे. सोयगाव परिसरात ठिकठिकाणी घरात पाणी शिरले आहे,. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.प्रशासनातर्फे दक्षतेचे आवाहनहरणबारी धरणातून मोसम नदीत विसर्ग सुरू असल्याने रविवारी सायंकाळी पाणी मालेगावात पोहोचले. पुनंद व चणकापूरमधून सुमारे २० हजार क्यूसेक पाणी सोडले आहे. नदीकाठच्या अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना महापालिकेतर्फे दवंडीद्वारे सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सकाळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाने तालुक्याचा दौरा करून पूरपाणी परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. त्यात गिरणा पूल, रोकडो मंदिर, वडनेर, अजंग-वडेल, द्याने, वैतागवाडी पूल, नवकिरण सायझिंगजवळील पुल, अल्लमा एकबाल पूल भागाची पाहणी केली. अल्लमा एकबाल पुलाजवळील झोपडपट्टीधारकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले.गिरणा धरणात १४.६८ जलसाठामालेगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात चणकापूर, पुनंद व हरणबारी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलद गतीने पाण्याचा साठा होत आहे. त्यामुळे गिरणा धरणात आजपावेतो ५७१५.७० टक्के जलसाठा झाला आहे. धरणात एकूण १४.६८ टक्के जलसाठा झाला आहे.चणकापूर मोठा प्रकल्पमधून १२ हजार क्यूसेक, पुनंद मध्य प्रकल्पातून ५ हजार क्यूसेक, तर इतर नदी, नाले मिळून गिरणा नदीत सुमारे २० हजार क्यूसेकपेक्षा जास्त पूरपाण्यात वाढ होत आहे. जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार हरणबारी धरणातून ६ हजार ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरणबारी मध्य प्रकल्पाच्या पूरपातळीत वाढ होऊन गिरणा व मोसम नदीकाठावरील नागरीवस्तीत पाणी शिरुन धोका निर्माण होऊ शकतो यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.मोसम नदीच्या पाणीपातळीत रात्रीतून वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून दूर रहावे, नदीकाठी व नदीवरील पुलांवर गर्दी करु नये, पुराच्या पाण्यात पोहण्याचा धोका पत्कारु नये, किंवा सेल्फी घेण्याचा मोह करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे.दरम्यान पुलामुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाचा दूरध्वनी क्रमांक ०२५५४-२३४५६७ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख संजय पवार यांनी केले आहे. सायंकाळी उघडीप सकाळपासून पावसाने रस्ते ओस पडले होते. सायंकाळी चार वाजेनंतर पावसाने उघडीप दिल्याने घरात अडकलेले नागरिक घराबाहेर पडू लागले होते. मोसमला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाजायखेडा : दीर्घ प्रतीक्षेनंतर हरणबारी धरण परिसरात व मोसम खोºयात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. या पावसामुळे खरिपाच्या शेती पिकांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. हरणबारी धरण लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोसम नदीस पूर आला असून, या पुरामुळे जायखेडा, सोमपूर, आसखेडा येथील पुलावरून पाणी गेल्याने भडाणे, तांदूळवाडी, नंदिन, जयपूर-मेंढीपाडे, एकलहरे, पिसोळ, वाघळे, श्रीपुरवडेसह अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. नदी पल्याड शेती असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारापाणी व दूध आणण्यासाठी आपल्या वैयक्तिक वाहनाने ताहराबाद किंवा नामपूर मार्गे १८ ते २० किलोमीटरचा फेरा मारत शेत गाठावे लागत आहे. नदीकाठावरील शेतातील पिकेही पाण्याखाली गेल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. हरणबारी धरण लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे हरणबारी धरणातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.मोसम नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीवरील अनेक पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनीही नदी काठच्या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पोलीसपाटलांमार्फत सूचना दिल्या आहेत. जायखेडा पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरून कुणीही ये-जा करू नये यासाठी ग्रामपंचायत कर्मच्याºयांमार्फत सूचना देण्यात येत आहेत.