शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नाशकात पावसाची धुवाधार बॅटिंग

By admin | Updated: September 12, 2015 23:11 IST

महापर्वणीवर सावट : पाण्याची पातळी वाढली

नाशिक : पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाने दीड तास ठाण मांडत विजेच्या कडकडाटात धुवाधार बॅटिंग केल्याने नाशिक शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहतानाच सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पिठोरी अमावास्येच्या मुहूर्तावर स्नानासाठी भाविकांना रामघाटावर जाण्यास मनाई करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट असून, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढल्या आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी रविवारी (दि. १३)श्रावणी अमावास्येला महापर्वणीनिमित्त प्रमुख आखाडे व खालशांमधील साधू-महंतांचे शाहीस्नान होणार आहे. त्यापूर्वीच पिठोरी अमावास्येचा मुहूर्त साधत भाविकांची सकाळपासूनच गोदाघाटावरील रामकुंडावर स्नानासाठी गर्दी उसळलेली असताना दुपारच्या सुमारास आकाशात कृष्णमेघांच्या गर्दीने अंधारून आले. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुमारे दीड तास पावसाने धुवाधार बॅटिंग करत नाशिकला अक्षरश: झोडपून काढले. पावसाचा जोर वाढत गेला तसे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शहरातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये तसेच, झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सागरमल मोदी हायस्कूल जवळ, जिल्हा परिषद कॉलनी तसेच, द्वारका परिसरात वृक्ष उन्मळून पडले. तिगरानिया कंपनीजवळ तसेच, सोमवारपेठेत खांदवे गणपतीजवळ घराची भिंत पडण्याची घटनाही घडली. तपोवनातील साधुग्राममध्येही अनेक खालशांच्या तंबूंमध्ये पाणी घुसले. भाविकांचेही त्यामुळे हाल झाले. प्रामुख्याने पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पोलिसांनी गोदास्नानासाठी गर्दी केलेल्या भाविकांना रामकुंड व रामघाट परिसर सोडण्याचे आवाहन करत परिसर रिकामा केला. गांधीतलावालगतच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनुचित घटना घडू नये म्हणून जीवरक्षकांनी परिसराचा ताबा घेतला. जिल्हा प्रशासन व महापालिकेची आपत्कालीन व्यवस्था लगेचच कार्यरत झाली. भाविकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात येऊ लागले. कपालेश्वर परिसरातही गुडघाभर पाणी साचल्याने भाविकांची तारांबळ उडाली. पाऊस सुरू असतानाही भाविकांनी रामसेतू ते टाळकुटेश्वर परिसरात स्नानासाठी गर्दी केली होती. रविवारी महापर्वणीकाळ असल्याने पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीला अगोदरच १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केल्याने गोदापात्रात वाहते पाणी असतानाच पावसानेही हजेरी लावल्याने आजूबाजूच्या नाले, ओहोळांचे पाणी गोदापात्रात येऊन मिळाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. कपालेश्वर परिसरात तर इंद्रकुंड परिसरातून येणाऱ्या नाल्याचे पाणी येऊन मिसळले. साधारणपणे सव्वा पाच वाजेच्या सुमारास पावसाचा जोर थंडावल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. शहर व परिसरात ढगाळ वातावरण कायम असून, रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.