शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पावसाची धुवाधार बॅटिंग

By admin | Updated: September 12, 2015 23:11 IST

महापर्वणीवर सावट : पाण्याची पातळी वाढली

नाशिक : पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाने दीड तास ठाण मांडत विजेच्या कडकडाटात धुवाधार बॅटिंग केल्याने नाशिक शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहतानाच सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पिठोरी अमावास्येच्या मुहूर्तावर स्नानासाठी भाविकांना रामघाटावर जाण्यास मनाई करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट असून, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढल्या आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी रविवारी (दि. १३)श्रावणी अमावास्येला महापर्वणीनिमित्त प्रमुख आखाडे व खालशांमधील साधू-महंतांचे शाहीस्नान होणार आहे. त्यापूर्वीच पिठोरी अमावास्येचा मुहूर्त साधत भाविकांची सकाळपासूनच गोदाघाटावरील रामकुंडावर स्नानासाठी गर्दी उसळलेली असताना दुपारच्या सुमारास आकाशात कृष्णमेघांच्या गर्दीने अंधारून आले. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुमारे दीड तास पावसाने धुवाधार बॅटिंग करत नाशिकला अक्षरश: झोडपून काढले. पावसाचा जोर वाढत गेला तसे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शहरातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये तसेच, झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सागरमल मोदी हायस्कूल जवळ, जिल्हा परिषद कॉलनी तसेच, द्वारका परिसरात वृक्ष उन्मळून पडले. तिगरानिया कंपनीजवळ तसेच, सोमवारपेठेत खांदवे गणपतीजवळ घराची भिंत पडण्याची घटनाही घडली. तपोवनातील साधुग्राममध्येही अनेक खालशांच्या तंबूंमध्ये पाणी घुसले. भाविकांचेही त्यामुळे हाल झाले. प्रामुख्याने पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पोलिसांनी गोदास्नानासाठी गर्दी केलेल्या भाविकांना रामकुंड व रामघाट परिसर सोडण्याचे आवाहन करत परिसर रिकामा केला. गांधीतलावालगतच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनुचित घटना घडू नये म्हणून जीवरक्षकांनी परिसराचा ताबा घेतला. जिल्हा प्रशासन व महापालिकेची आपत्कालीन व्यवस्था लगेचच कार्यरत झाली. भाविकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात येऊ लागले. कपालेश्वर परिसरातही गुडघाभर पाणी साचल्याने भाविकांची तारांबळ उडाली. पाऊस सुरू असतानाही भाविकांनी रामसेतू ते टाळकुटेश्वर परिसरात स्नानासाठी गर्दी केली होती. रविवारी महापर्वणीकाळ असल्याने पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीला अगोदरच १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केल्याने गोदापात्रात वाहते पाणी असतानाच पावसानेही हजेरी लावल्याने आजूबाजूच्या नाले, ओहोळांचे पाणी गोदापात्रात येऊन मिळाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. कपालेश्वर परिसरात तर इंद्रकुंड परिसरातून येणाऱ्या नाल्याचे पाणी येऊन मिसळले. साधारणपणे सव्वा पाच वाजेच्या सुमारास पावसाचा जोर थंडावल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. शहर व परिसरात ढगाळ वातावरण कायम असून, रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.