शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पावसाची दिवसभर दम‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ...

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळे पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकीय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरू राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपूर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अडगळीत पडलेले रेनकोटदेखील बाहेर आले.

--इन्फो--

हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस

बुधवारी मध्यरात्री तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत १०.५ असा एकूण २३.९ मिमी इतका पाऊस शहरात पडला. संध्याकाळनंतरसुध्दा पावसाची संततधार ही कायम होती. हंगामात प्रथमच इतका पाऊस शहरात झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--इन्फो--

उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

पावसाच्या संततधारेमध्ये विजेचा लपंडाव पहाटेपासून काही उपनगरांमध्ये पहावयास मिळाला. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी कमी व्होल्टेजने वीजपुरवठा अशी स्थिती वडाळावासीयांना ऐन सणासुदीच्या दिवशी अनुभवयास आली. या भागातील विजेचा लपंडावाची समस्या ही मागील काही दिवसांपासून कायम आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. काठेगल्ली, टाकळी रोड, अशोकामार्ग, पखाल रोड या भागातही अधूनमधून विजेचा लपंडाव रहिवाशांना अनुभवयास आला.

--इन्फो--

पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे

गंगापूर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८ मिमी इतका पाऊस गंगापूर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापूर धरणसमूहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढू लागला असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.