शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पावसाची दिवसभर दम‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ...

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळे पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकीय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरू राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपूर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अडगळीत पडलेले रेनकोटदेखील बाहेर आले.

--इन्फो--

हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस

बुधवारी मध्यरात्री तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत १०.५ असा एकूण २३.९ मिमी इतका पाऊस शहरात पडला. संध्याकाळनंतरसुध्दा पावसाची संततधार ही कायम होती. हंगामात प्रथमच इतका पाऊस शहरात झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--इन्फो--

उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

पावसाच्या संततधारेमध्ये विजेचा लपंडाव पहाटेपासून काही उपनगरांमध्ये पहावयास मिळाला. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी कमी व्होल्टेजने वीजपुरवठा अशी स्थिती वडाळावासीयांना ऐन सणासुदीच्या दिवशी अनुभवयास आली. या भागातील विजेचा लपंडावाची समस्या ही मागील काही दिवसांपासून कायम आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. काठेगल्ली, टाकळी रोड, अशोकामार्ग, पखाल रोड या भागातही अधूनमधून विजेचा लपंडाव रहिवाशांना अनुभवयास आला.

--इन्फो--

पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे

गंगापूर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८ मिमी इतका पाऊस गंगापूर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापूर धरणसमूहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढू लागला असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.