शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पावसाची दिवसभर दम‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ...

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळे पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकीय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरू राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपूर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अडगळीत पडलेले रेनकोटदेखील बाहेर आले.

--इन्फो--

हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस

बुधवारी मध्यरात्री तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत १०.५ असा एकूण २३.९ मिमी इतका पाऊस शहरात पडला. संध्याकाळनंतरसुध्दा पावसाची संततधार ही कायम होती. हंगामात प्रथमच इतका पाऊस शहरात झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--इन्फो--

उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

पावसाच्या संततधारेमध्ये विजेचा लपंडाव पहाटेपासून काही उपनगरांमध्ये पहावयास मिळाला. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी कमी व्होल्टेजने वीजपुरवठा अशी स्थिती वडाळावासीयांना ऐन सणासुदीच्या दिवशी अनुभवयास आली. या भागातील विजेचा लपंडावाची समस्या ही मागील काही दिवसांपासून कायम आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. काठेगल्ली, टाकळी रोड, अशोकामार्ग, पखाल रोड या भागातही अधूनमधून विजेचा लपंडाव रहिवाशांना अनुभवयास आला.

--इन्फो--

पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे

गंगापूर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८ मिमी इतका पाऊस गंगापूर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापूर धरणसमूहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढू लागला असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.