शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पावसाची दिवसभर दम‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ...

नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळे पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकीय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरू राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपूर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अडगळीत पडलेले रेनकोटदेखील बाहेर आले.

--इन्फो--

हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस

बुधवारी मध्यरात्री तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत १०.५ असा एकूण २३.९ मिमी इतका पाऊस शहरात पडला. संध्याकाळनंतरसुध्दा पावसाची संततधार ही कायम होती. हंगामात प्रथमच इतका पाऊस शहरात झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--इन्फो--

उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

पावसाच्या संततधारेमध्ये विजेचा लपंडाव पहाटेपासून काही उपनगरांमध्ये पहावयास मिळाला. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी कमी व्होल्टेजने वीजपुरवठा अशी स्थिती वडाळावासीयांना ऐन सणासुदीच्या दिवशी अनुभवयास आली. या भागातील विजेचा लपंडावाची समस्या ही मागील काही दिवसांपासून कायम आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. काठेगल्ली, टाकळी रोड, अशोकामार्ग, पखाल रोड या भागातही अधूनमधून विजेचा लपंडाव रहिवाशांना अनुभवयास आला.

--इन्फो--

पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे

गंगापूर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८ मिमी इतका पाऊस गंगापूर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापूर धरणसमूहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढू लागला असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.