शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:30 IST

भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे.

भगूर : भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे.  भगूर येथून सिन्नर-घोटी रस्त्याकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तीनही तालुक्यातील वाहनधारक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रेल्वेगेटवर रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेस वाहनधारकांना थांबावे लागते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. वाहनधारकांची व ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन भगूर रेल्वे फाटक येथे रेल्वे प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात  आले. ४५० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळयामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेस सर्वांनाच ताटकळत उभे राहावे लागते. उड्डाण पुलाचे दोन्ही बाजूंनी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रूळावरील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाहनधारकांची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक उपलब्ध करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक