नाशिकरोड : मुंबईहून नाशिकला येणाऱ्या (डाऊन) रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळील आटगांव येथे पहाटे मालगाडीचे इंजिन नादुरूस्त झाल्याने मध्य रेल्वेची मुंबई-नाशिक रेल्वे सेवा तीन तास विस्कळीत झाली. यामुळे मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे इंजिन आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कसाऱ्याजवळील आटगांव येथे नादुरूस्त झाले. यामुळे मुंबईहून येणाऱ्या मुंबई-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर काशी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस एक तास, मुंबई-भुसावळ पॅसेंजर पावणेदोन तास व दादर-गोहाटी एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावत होत्या. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईहून सुटलेल्या रेल्वे टप्याटप्याने थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास व दगदग सहन करावी लागली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मालगाडी डाऊन मार्गावरून हलविल्यानंतर मुंबई-नाशिक रेल्वेसेवा हळुहळु पूर्वपदावर आली.मुंबई-ठाणे परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचले होते. यामुळे मुंबईहून येणाऱ्या गोदावरी, सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ या गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. नाशिकरोड रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेले होते. (प्रतिनिधी)दूरध्वनी सेवा खंडित; बॅँकांचे व्यवहार ठप्पवडनेरभैरव : येथे गेल्या तीन दिवसांपासून भारत दूरसंचारची सेवा विस्कळीत झाल्याने बॅँका, पतसंस्था व सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.दूरध्वनी केंद्राकडे येणारी आॅप्टिकल फायबरची लाइन वडाळीभोईजवळ अचानक तुटल्याने वडनेरभैरव परिसरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले तर बॅँक आॅफ महाराष्ट्रमधून इंटरनेट बंद झाल्याने एकही व्यवहार होऊ शकले नाही.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: July 12, 2014 00:29 IST