शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सब-वे बाबत रेल्वे प्रशासनाचे घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:04 IST

नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने घूमजाव करीत सब-वे शेजारी भिंत बांधण्याची सुरुवात केल्याने लक्ष्मी थिएटर्स जवळील नागरिकांचा संपर्क पुन्हा खंडित झाला आहे.

ठळक मुद्देनांदगाव : भिंत बांधकामामुळे नागरिकांचा संपर्क खंडित

नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने घूमजाव करीत सब-वे शेजारी भिंत बांधण्याची सुरुवात केल्याने लक्ष्मी थिएटर्स जवळील नागरिकांचा संपर्क पुन्हा खंडित झाला आहे.रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सोबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, भुसावळ विभागाचे मंडळ महाप्रबंधक एस.एस केडिया यांनी घेतलेल्या वेबेक्स बैठकीला सब-वेतील असलेल्या दोषांची दुरुस्ती करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानंतर सब-वेत साचलेल्या पाण्यामुळे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने रेल्वे क्रॉसिंग करण्याच्या प्रयत्नात रविवारी एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात जाब विचारला तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते.

सोमवारी (दि.११)त्याप्रमाणे आरपीएफ नियुक्त देखील करण्यात आले. मात्र दुपार नंतर लक्ष्मी थिएटर्स कडील वापरात नागरिकांचा मार्ग लोखंडी जाळी लावून अचानक बंद करण्यात आला. शिवाय सबवे लगत लेंडी नदी शेजारील रस्त्यावर भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने संतप्त नागरिकांच्या दुखण्यावर मीठ चोळले गेले.आले अधिकाऱ्यांच्या मना...!एकीकडे सब-वेत असलेल्या तांत्रिक आराखड्यातील दोष दूर करण्याची ग्वाही द्यायची अन् दुसरीकडे दिलेल्या आश्वासनाचा शब्द पाळण्याऐवजी चक्क वेठीला धरायचे अशा लहरी कारभाराला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे. केंद्रात थेट मंत्रिमंडळात असणाऱ्या राज्यमंत्र्यालाच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याऐवजी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने दिलेल्या सूचना झुगारत मनमानी सुरु केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे ह्यआले रेल्वे अधिकाऱ्यांच्या मना, तेथे कुणाचे चालेनाह्ण असा विचित्र अनुभवाला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेroad safetyरस्ते सुरक्षा