शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:46 IST

शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .

दिंडोरी : शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .  कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा चेअरमन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलर पूजन कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद सौ व श्री पाटीलबुवा हरिभाऊ बर्डे, सौ. व श्री तानाजी निवृत्ती कामाले यांच्या हस्ते झाली.पुढे बोलताना श्रीराम शेटे म्हणाले, आपण गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणावर मशिनरीत बदल , दुरुस्ती केल्यामुळे आज कारखाण्याची गाळप क्षमता वाढली असून गळीताचे दिवस कमी झाले. आपल्याला फक्त साखरेवर विसंबून न राहता भविष्याची परिस्थिती ओळखून विस्तारीकरण तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. टप्प्या टप्प्याने द्यावयाचे एफआरपी बद्दल बोलताना ते म्हणाले बँक आपल्याला साखर पोत्यावर १७०० ते १८०० रु पये उचलदर देईल त्यात थोडेफार पैसे टाकून पहीला हप्ता २००० व उर्वरीत रक्कम ही हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब देशमुख, आत्माराम पाटील, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.पूर्वी पूर्व भागात ऊस होता तेव्हा कपाती झाल्या म्हणूनच आज कारखाना उभाआहे हे विसरता येणार नाही २००७ ला काय परिस्थिती होती आज काय आहे हे समजून घ्या विस्तारीकरण डीस्टिलरी इथेनॉल हे यापूर्वीच व्हायला हवे होते आता संधी आली आहे ती सोडू नये.- आत्माराम पाटील, सोनजांबकारखान्याच्या विकासाच्या दृष्टीने विस्तारीकरन व इथेनॉल प्रकल्प उभारणीला आमचा विरोध नाही हवेतर शेअर्सची किंमत वाढवा परंतु ऊस बिलातून कोणीतीही रक्कम कपात करू नये.- बाळासाहेब देशमुख , लखमापूर

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने