शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:46 IST

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, रब्बी हंगाम संकटात आला आहे. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असून, महागडी औषधे फवारणी करून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंताग्रस्त : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांदा पिकावर प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, रब्बी हंगाम संकटात आला आहे. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असून, महागडी औषधे फवारणी करून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कसमादे पट्ट्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरु वातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. पण निसर्गाच्या लहरीपणा आणि बदलत्या हवामान बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही.परिणामी महागड्या औषधांची फवारणी करु न कांदा पीक वाचविण्याची वेळ परिसरातील बळीराजावर आली आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरु वातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणा मध्ये बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकाला मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. पाच- सहा वर्षापासून वरु णराजा रु सल्याने परिसरात पाण्याचे मोठे संकट होते.पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहु, हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला आणि हरभºयाला बसला आहे. ऐन गाठे भरण्याच्या वेळेस हरभरा पिकाला अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.शेतकºयांना या वर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसाच उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता परंतु व्याजाचे व उसनावरीने पैसे घेऊन रबी हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकºयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचवण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.दोन एकर कांदा लागवड करून दोन ते अडीच महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्याला अनेक रोगांची लागण होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत पाहता शेती व्यवसाय आता एक प्रकारचा जुगारच झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील की नाही याचा भरवसा राहिला नाही.- जिभाऊ खैरनार, कांदा उत्पादक शेतकरी, वटार

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा