शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:46 IST

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, रब्बी हंगाम संकटात आला आहे. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असून, महागडी औषधे फवारणी करून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंताग्रस्त : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांदा पिकावर प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, रब्बी हंगाम संकटात आला आहे. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असून, महागडी औषधे फवारणी करून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कसमादे पट्ट्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरु वातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. पण निसर्गाच्या लहरीपणा आणि बदलत्या हवामान बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही.परिणामी महागड्या औषधांची फवारणी करु न कांदा पीक वाचविण्याची वेळ परिसरातील बळीराजावर आली आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरु वातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणा मध्ये बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकाला मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. पाच- सहा वर्षापासून वरु णराजा रु सल्याने परिसरात पाण्याचे मोठे संकट होते.पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहु, हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला आणि हरभºयाला बसला आहे. ऐन गाठे भरण्याच्या वेळेस हरभरा पिकाला अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.शेतकºयांना या वर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसाच उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता परंतु व्याजाचे व उसनावरीने पैसे घेऊन रबी हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकºयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचवण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.दोन एकर कांदा लागवड करून दोन ते अडीच महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्याला अनेक रोगांची लागण होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत पाहता शेती व्यवसाय आता एक प्रकारचा जुगारच झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील की नाही याचा भरवसा राहिला नाही.- जिभाऊ खैरनार, कांदा उत्पादक शेतकरी, वटार

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा