शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

नाशिकमध्ये रबीच्या आशा धूसर; कडधान्याचे भाव वाढले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:16 IST

बाजारगप्पा :नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत.

- संजय दुनबळे (नाशिक)

दिवाळीनंतर मागील सोमवारपासून कामकाज सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत. रबी हंगामाचा कोणताही अंदाज नसल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्यांचे भाव किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढले आहेत. शेतमालाची आवक पाहून भाव ठरत असले तरी मक्याचे भाव अद्याप स्थिर असल्याचे दिसून आले. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीनंतर गेल्या मंगळवारपासून भुसार मालाचे लिलाव सुरू झाले. येथे मक्याची सुमारे २०० टनाची आवक असून, कोरड्या मक्याला १४०० रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळत आहे. बाजरीच्या आवकेत काहीशी घट झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत आहे. लासलगावी हरभरा, तूर, उडीद या कडधान्यांची आवक कमी झाली असून, सर्वच कडधान्यांचे भाव वाढले आहेत. हरभऱ्याला साधारणत: ४६०० ते ४७००, तुरीला ३७०० ते ३८०० रुपये, तर उडिदाला ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत असून, या कडधान्यांच्या दरात किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी नाही. त्याचबरोबर धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन सुटेल की नाही याचाही अंदाज नसल्याने रबीचे पीक समोर दिसत नसल्याने कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मालेगाव बाजार समितीत कडधान्याबरोबरच गव्हाचेही दर वाढले असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी दिली. येथे गव्हाला किमान २७०० रुपये प्रतिक्विं टलचा भाव मिळत आहे. बाजरीची आवक कमी झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपयांपर्यंत प्रतिक्विं टल दर मिळत आहे. या बाजार समितीतही कडधान्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे कोतकर म्हणाले. 

आगामी काळात आवक अधिकच मंदावण्याची शक्यता असल्याने भुसार मालाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज कोतकर यांनी व्यक्त केला. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची बऱ्यापैकी आवक असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती कमीच असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी येथे सुमारे १०० वाहनांतून मक्याची आवक झाली. १४११ रुपये प्रतिक्विं टलचा दर मक्याला जाहीर झाला. गहू, बाजरी, हरभरा, तूर, भुईमूग या शेतमालाची आवक किरकोळ स्वरूपात असून, त्यांचे भाव टिकून आहेत. येथे गहू २५०३ रुपये, तर भुईमूग ६३५१ रुपये प्रतिक्विं टल दराने विकला गेला. हंगामी मार्केट असलेल्या चांदवड बाजार समितीत केवळ मक्याची आवक होत आहे. येथे बुधवारी केवळ १६ वाहनांमधून मका विक्रीसाठी आला होता. भाव साधारणत: १३८१ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी