शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

नाशिक जिल्ह्यात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 20:04 IST

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या

ठळक मुद्दे१२० टक्के पेरण्या पूर्ण : हरभरा घटला, कांदा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदात असताना रब्बीलाही हातभार लावण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी, या पावसामुळे जमिनीखालच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन परिणामी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ३०५ हेक्टरवर रब्बीची लागवड पूर्ण होऊन जवळपास १२१ टक्के पेरण्यात करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच रब्बीच्या क्षेत्रात व पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाल्या. तर यंदा पहिल्यांदाच नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, त्याचबरोबर धरणेदेखील ओव्हरफ्लो होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. खरिपात शेतकऱ्यांना बंपर उत्पादन येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आॅक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सलग बारा दिवसांहून अधिक पावसाने हजेरी कायम ठेवली, त्यातून शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला. एरव्ही डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या आटोपत असताना यंदा मात्र जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत शेतकºयांनी पेरण्या केल्या. जिल्ह्यात एक लाख १२ हजार ९१६ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असले तरी, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींना पाणी असल्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी रब्बीसाठी जमिनीची मशागत करून पीक पेरणी केली. त्यामुळे जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली. सर्वच्या सर्व क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून, यात प्रामुख्याने गहू, मका (स्विटकॉर्न) व हरभरा या तीन पिकांचा समावेश असला तरी, मध्यंतरी हवामान बदलाचा फटका हरभºयाच्या क्षेत्राला बसला. त्यामुळे यंदा हरभºयाचे क्षेत्र कमी होऊन त्याऐवजी शेतकºयांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक