शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाशिक जिल्ह्यात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 20:04 IST

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या

ठळक मुद्दे१२० टक्के पेरण्या पूर्ण : हरभरा घटला, कांदा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदात असताना रब्बीलाही हातभार लावण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी, या पावसामुळे जमिनीखालच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन परिणामी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ३०५ हेक्टरवर रब्बीची लागवड पूर्ण होऊन जवळपास १२१ टक्के पेरण्यात करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच रब्बीच्या क्षेत्रात व पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाल्या. तर यंदा पहिल्यांदाच नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, त्याचबरोबर धरणेदेखील ओव्हरफ्लो होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. खरिपात शेतकऱ्यांना बंपर उत्पादन येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आॅक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सलग बारा दिवसांहून अधिक पावसाने हजेरी कायम ठेवली, त्यातून शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला. एरव्ही डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या आटोपत असताना यंदा मात्र जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत शेतकºयांनी पेरण्या केल्या. जिल्ह्यात एक लाख १२ हजार ९१६ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असले तरी, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींना पाणी असल्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी रब्बीसाठी जमिनीची मशागत करून पीक पेरणी केली. त्यामुळे जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली. सर्वच्या सर्व क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून, यात प्रामुख्याने गहू, मका (स्विटकॉर्न) व हरभरा या तीन पिकांचा समावेश असला तरी, मध्यंतरी हवामान बदलाचा फटका हरभºयाच्या क्षेत्राला बसला. त्यामुळे यंदा हरभºयाचे क्षेत्र कमी होऊन त्याऐवजी शेतकºयांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक