शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
4
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
5
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
6
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
7
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
8
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
9
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
11
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
12
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
13
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
14
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
16
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
17
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
18
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
19
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
20
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

ढगाळ हवामानामुळे रब्बीची आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला ...

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमीन पिकांसह वाहून गेल्या होत्या. नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली आहे. परतीच्या पावसामुळे आजही नद्यांना काही प्रमाणात पाणी आहे लहान-मोठी बंधारी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतीच्या उपयोगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव गेल्या हंगामातील नुकसानाची आर्थिक तूट भरून निघेल, या आशेने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. लोकडाऊननंतर वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे साहजिकच लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याबरोबरच गहू, हरभरा, भुईमूग, काही ठिकाणी मका लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांसाठी वातावरण पोषक राहिले नाही, त्यातच अचानकपणे थंडी, ढगाळ वातावरण, धुके, दवं, अधूनमधून बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. या साऱ्या खराब वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अभ्रच्छादित वातावरणामुळे पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असून, अपुरा सूर्यप्रकशामुळे कोवळी पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचे सावट दिसून येत आहे. खरीपातील झालेल्या नुकसानीची जखम ताजी असताना अशा आसमानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जातो की काय, याचे संकेत मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.