शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ढगाळ हवामानामुळे रब्बीची आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला ...

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमीन पिकांसह वाहून गेल्या होत्या. नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली आहे. परतीच्या पावसामुळे आजही नद्यांना काही प्रमाणात पाणी आहे लहान-मोठी बंधारी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतीच्या उपयोगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव गेल्या हंगामातील नुकसानाची आर्थिक तूट भरून निघेल, या आशेने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. लोकडाऊननंतर वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे साहजिकच लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याबरोबरच गहू, हरभरा, भुईमूग, काही ठिकाणी मका लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांसाठी वातावरण पोषक राहिले नाही, त्यातच अचानकपणे थंडी, ढगाळ वातावरण, धुके, दवं, अधूनमधून बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. या साऱ्या खराब वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अभ्रच्छादित वातावरणामुळे पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असून, अपुरा सूर्यप्रकशामुळे कोवळी पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचे सावट दिसून येत आहे. खरीपातील झालेल्या नुकसानीची जखम ताजी असताना अशा आसमानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जातो की काय, याचे संकेत मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.