शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे रब्बीची आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला ...

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमीन पिकांसह वाहून गेल्या होत्या. नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली आहे. परतीच्या पावसामुळे आजही नद्यांना काही प्रमाणात पाणी आहे लहान-मोठी बंधारी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतीच्या उपयोगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव गेल्या हंगामातील नुकसानाची आर्थिक तूट भरून निघेल, या आशेने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. लोकडाऊननंतर वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे साहजिकच लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याबरोबरच गहू, हरभरा, भुईमूग, काही ठिकाणी मका लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांसाठी वातावरण पोषक राहिले नाही, त्यातच अचानकपणे थंडी, ढगाळ वातावरण, धुके, दवं, अधूनमधून बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. या साऱ्या खराब वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अभ्रच्छादित वातावरणामुळे पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असून, अपुरा सूर्यप्रकशामुळे कोवळी पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचे सावट दिसून येत आहे. खरीपातील झालेल्या नुकसानीची जखम ताजी असताना अशा आसमानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जातो की काय, याचे संकेत मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.