शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात रब्बी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

ठळक मुद्देशेतकरीवर्ग चिंतित । ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे आक्र मण

गोरख घुसळे ।पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदारोपे व द्राक्षबागा या नगदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. आशाही परिस्थितीत शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली तसेच उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांना चांगला बहार आल्याने शेतकरीवर्ग आनंदात असतानाच गेल्या वीस-बावीस दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने व रोज पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील या पिकांवर मावा, मर, अळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्ग ही पिके वाचविण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करून पिके जागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे निम्यापेक्षा जास्त द्राक्षबागा या वांझोट्या निघाल्या असून, शेतकऱ्यांनी केलेला लाखो रु पयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. ज्या शेतकºयांनी मागील महिन्यात उशिरा द्राक्षबागांची छाटणी केली आहे. अशा द्राक्षबागा सुस्थितीत आहेत. मात्र ढगाळ हवामान व धुक्याने तसेच दवबिंदूमुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच द्राक्षबागांवर लष्करी अळीनेही मोठ्या प्रमाणात आक्र मण केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरीवर्गाला चणचण भासू लागली आहे.गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, वातावरणात रोजच बदल होत आहे. या हवामानबदलाचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होत असून, द्राक्षबागांवर डावणी, भुरी यासारख्या रोगांनी आक्र मण केले आहे तसेच लष्करी अळीनेही बागा धोक्यात आल्या आहेत, असे द्राक्ष उत्पादक रवींद्र शेळके म्ह्णाले. तरअवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, आता रब्बी हंगामही सततच्या बदलत्या वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय याची चिंता लागली असल्याचे शेतकरी सदाशिव बागुल यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र