शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

येवला तालुक्यात रब्बी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

ठळक मुद्देशेतकरीवर्ग चिंतित । ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे आक्र मण

गोरख घुसळे ।पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदारोपे व द्राक्षबागा या नगदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. आशाही परिस्थितीत शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली तसेच उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांना चांगला बहार आल्याने शेतकरीवर्ग आनंदात असतानाच गेल्या वीस-बावीस दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने व रोज पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील या पिकांवर मावा, मर, अळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्ग ही पिके वाचविण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करून पिके जागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे निम्यापेक्षा जास्त द्राक्षबागा या वांझोट्या निघाल्या असून, शेतकऱ्यांनी केलेला लाखो रु पयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. ज्या शेतकºयांनी मागील महिन्यात उशिरा द्राक्षबागांची छाटणी केली आहे. अशा द्राक्षबागा सुस्थितीत आहेत. मात्र ढगाळ हवामान व धुक्याने तसेच दवबिंदूमुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच द्राक्षबागांवर लष्करी अळीनेही मोठ्या प्रमाणात आक्र मण केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरीवर्गाला चणचण भासू लागली आहे.गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, वातावरणात रोजच बदल होत आहे. या हवामानबदलाचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होत असून, द्राक्षबागांवर डावणी, भुरी यासारख्या रोगांनी आक्र मण केले आहे तसेच लष्करी अळीनेही बागा धोक्यात आल्या आहेत, असे द्राक्ष उत्पादक रवींद्र शेळके म्ह्णाले. तरअवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, आता रब्बी हंगामही सततच्या बदलत्या वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय याची चिंता लागली असल्याचे शेतकरी सदाशिव बागुल यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र