शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
5
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
6
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
7
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
8
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
9
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
10
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
11
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
12
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
13
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
14
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
15
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
16
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
17
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
18
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
19
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
20
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

येवला तालुक्यात रब्बी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

ठळक मुद्देशेतकरीवर्ग चिंतित । ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे आक्र मण

गोरख घुसळे ।पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदारोपे व द्राक्षबागा या नगदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. आशाही परिस्थितीत शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली तसेच उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांना चांगला बहार आल्याने शेतकरीवर्ग आनंदात असतानाच गेल्या वीस-बावीस दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने व रोज पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील या पिकांवर मावा, मर, अळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्ग ही पिके वाचविण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करून पिके जागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे निम्यापेक्षा जास्त द्राक्षबागा या वांझोट्या निघाल्या असून, शेतकऱ्यांनी केलेला लाखो रु पयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. ज्या शेतकºयांनी मागील महिन्यात उशिरा द्राक्षबागांची छाटणी केली आहे. अशा द्राक्षबागा सुस्थितीत आहेत. मात्र ढगाळ हवामान व धुक्याने तसेच दवबिंदूमुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच द्राक्षबागांवर लष्करी अळीनेही मोठ्या प्रमाणात आक्र मण केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरीवर्गाला चणचण भासू लागली आहे.गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, वातावरणात रोजच बदल होत आहे. या हवामानबदलाचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होत असून, द्राक्षबागांवर डावणी, भुरी यासारख्या रोगांनी आक्र मण केले आहे तसेच लष्करी अळीनेही बागा धोक्यात आल्या आहेत, असे द्राक्ष उत्पादक रवींद्र शेळके म्ह्णाले. तरअवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, आता रब्बी हंगामही सततच्या बदलत्या वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय याची चिंता लागली असल्याचे शेतकरी सदाशिव बागुल यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र