शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:03 IST

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : बळीराजा हवालदिल, शासनाकडुन मदतीची प्रतीक्षाच

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणावर झालेले नुकसान आणि सद्या वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.वातावरणातील बदलामुळे पिकांवर मोठ्याप्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव बघावयास मिळत आहे. द्राक्षांसह पाले-फळ भाज्यांवर भुरी, डावण्या, मिलीबग, मावा, तुडतुडे, सनबर्ग, फुलगळ, फळांमध्ये अळ्या, करपा, फळकुज, तेल्या यांसारखे अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हैराण झालेला आहे.खेडलेझुंगे, कोळगांव, कानळद, रूई-धानोरे, धारणगांव वीर/खडक, सारोळे थडीसह निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे होवुन महिना उलटुन गेलेला आहे. तालुकास्तरावरील कामे अपुर्ण असल्याने शेतकºयांना मदत मिळालेली नाही. शासनाने तात्काळ वाढीव मदत देवुन शेतकºयांना मरणाच्या दारातून परत आणावे. परतीच्या पावसाने कांद्याचे रोप पुर्ण वाहुन गेली, काही ठिकाणी सडुन गेली, त्यामुळे कांद्याचे उळे वाढीव दराने खरेदी करून कांद्याचे उळे टाकण्याची लगबग बºयाच भागात बघावयास मिळत आहे. परंतु सद्याच्या लहरी वातावरणामुळे रोप लागवडीसाठी उतरेल की नाही याची शाशंका मात्र शेतकºयांच्या मनामध्ये घर करु न आहे. (०२ खेडलेझुंगे १/२)

टॅग्स :Nashikनाशिक