शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:03 IST

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : बळीराजा हवालदिल, शासनाकडुन मदतीची प्रतीक्षाच

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणावर झालेले नुकसान आणि सद्या वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.वातावरणातील बदलामुळे पिकांवर मोठ्याप्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव बघावयास मिळत आहे. द्राक्षांसह पाले-फळ भाज्यांवर भुरी, डावण्या, मिलीबग, मावा, तुडतुडे, सनबर्ग, फुलगळ, फळांमध्ये अळ्या, करपा, फळकुज, तेल्या यांसारखे अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हैराण झालेला आहे.खेडलेझुंगे, कोळगांव, कानळद, रूई-धानोरे, धारणगांव वीर/खडक, सारोळे थडीसह निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे होवुन महिना उलटुन गेलेला आहे. तालुकास्तरावरील कामे अपुर्ण असल्याने शेतकºयांना मदत मिळालेली नाही. शासनाने तात्काळ वाढीव मदत देवुन शेतकºयांना मरणाच्या दारातून परत आणावे. परतीच्या पावसाने कांद्याचे रोप पुर्ण वाहुन गेली, काही ठिकाणी सडुन गेली, त्यामुळे कांद्याचे उळे वाढीव दराने खरेदी करून कांद्याचे उळे टाकण्याची लगबग बºयाच भागात बघावयास मिळत आहे. परंतु सद्याच्या लहरी वातावरणामुळे रोप लागवडीसाठी उतरेल की नाही याची शाशंका मात्र शेतकºयांच्या मनामध्ये घर करु न आहे. (०२ खेडलेझुंगे १/२)

टॅग्स :Nashikनाशिक