शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.

ठळक मुद्देठाणगाव : विहिरीत पाणी असूनही घेता येत नसल्याने शेतकरी त्रस्त

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.महावितरणच्या नवीन वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास दिवसा वीजपुरवठा व आठ तास रात्री वीजपुरवठा करण्याचे ठरले आहे, परंतु ठाणगावला गेल्या तीन दिवसात एकही दिवस थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत चाललेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेऊ नये हीच शेतकरी बांधवांनी महावितरणकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतमालाला बाजार पेठेत दर नाही, निदान गव्हाचे पीक तरी सुटावे हीच अपेक्षा शेतकºयांना आहे.लवकरात लवकर वीज मंडळानी याची दखल घ्यावी, अशी मागणी रामदास भोर, किरण बोºहाडे, सचिन रायजादे, धोंडीराम व्यवहारे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर भोर, किशोर शिंदे, सुभाष शिंदे, वसंत आव्हाड, राहुल काकड, शिंदे पाटील आदींसह शेतकºयांनी दिला आहे. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून, पाणी असूनही पिकास पाणी भरता येत नाही. उंबरदरी धरणामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. शेतात गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असून, वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. वीज उपकेंद्रात अथवा कर्मचाºयांना फोन केला की दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी