शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.

ठळक मुद्देठाणगाव : विहिरीत पाणी असूनही घेता येत नसल्याने शेतकरी त्रस्त

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.महावितरणच्या नवीन वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास दिवसा वीजपुरवठा व आठ तास रात्री वीजपुरवठा करण्याचे ठरले आहे, परंतु ठाणगावला गेल्या तीन दिवसात एकही दिवस थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत चाललेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेऊ नये हीच शेतकरी बांधवांनी महावितरणकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतमालाला बाजार पेठेत दर नाही, निदान गव्हाचे पीक तरी सुटावे हीच अपेक्षा शेतकºयांना आहे.लवकरात लवकर वीज मंडळानी याची दखल घ्यावी, अशी मागणी रामदास भोर, किरण बोºहाडे, सचिन रायजादे, धोंडीराम व्यवहारे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर भोर, किशोर शिंदे, सुभाष शिंदे, वसंत आव्हाड, राहुल काकड, शिंदे पाटील आदींसह शेतकºयांनी दिला आहे. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून, पाणी असूनही पिकास पाणी भरता येत नाही. उंबरदरी धरणामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. शेतात गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असून, वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. वीज उपकेंद्रात अथवा कर्मचाºयांना फोन केला की दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी