शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पाणीप्रश्नावरून आता खान्देश-कसमादे वाद पेटला

By admin | Updated: November 14, 2015 23:12 IST

पाणीप्रश्नावरून आता खान्देश-कसमादे वाद पेटला

नाशिक : जळगावच्या आमदारांची महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यासमवेत नियोजित बैठकीची माहिती मिळाल्याने आणि ही बैठक नाशिकमधून जळगावसाठी पाणी नेण्यासंदर्भात असल्याने कसमादेविरुद्ध खान्देश असा नवीनच वाद आता पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.यासंदर्भात उद्या रविवारी (दि.१५) देवळा येथे सर्वपक्षीय नेत्यांची व स्थानिक आमदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कसमादे परिसरातील आमदारांची व जळगाव जिल्ह्यातील आमदारांची ५ नोव्हेंबर रोजी एक बैठक होऊन त्यात गिरणा धरणाच्या वरील बाजूस जलशयातून २०१५-१६ मध्ये समन्यायी पाणीवाटपाचा भाग म्हणून पाणी सोडण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री दादा भुसे, आमदार दीपिका संजय चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार आसिफ शेख, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह कसमादे परिसरातील आमदार व जळगाव जिल्ह्यातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत गिरणा धरणावरील बाजूस असलेल्या चणकापूर, हरणबारी, पूनद, केळझर या धरणातून जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या पिण्यासाठी पाणी म्हणून गिरणा धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. याची पुढील सुनावणी आता १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे होणार आहे. आधीच मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून तब्बल १२ टिएमसी पाणी सोडण्यात आल्याने मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद पेटलेला असतानाच आता कसमादे परिसरातील पाणी जळगाव जिल्ह्यात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कसमादेविरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा नवीन वाद पाणीप्रश्नी उभा राहण्याची चिन्हे आहेत. उद्या रविवारी (दि.१५) यासंदर्भात देवळा येथील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक दुपारी २ वाजता बोलविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)