शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

अवकाळीने सुटला पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न

By admin | Updated: March 3, 2016 23:02 IST

अवकाळीने सुटला पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न

 ममदापूर : परिसरात वादळी पावसाने हरणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, पाण्याच्या शोधात होणारी भटकंती पुढील एक महिना तरी थांबणार आहे. राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हरणांसाठी पंधरा दिवसातून एकदा पाणवठे भरण्यात येत होते; परंतु कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन तसेच गाय, शेळी, मेंढी आदि पशुपक्षी सर्व पाणवठ्यावर तहान भागविण्यासाठी येत असल्याने नऊ हजार लिटर क्षमतेचे पाणवठे कोरडे पडल्यामुळे हरणे पाण्याच्या शोधात गावाकडे येत असत. त्यामुळे कधी कुत्र्याचा हल्ला, कधी विहिरीत पडून मृत्यूचा सामना करावा लागत असे. मात्र अवकाळीमुळे जंगलातील माती बांध, वनतळे तीस टक्के भरले आहेत. या भागात डोंगर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पाणी लगेच वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे छोटे बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले; परंतु या भागात नुकसान होईल असे काही झाले नाही, परंतु हरणासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ही चांगली गोष्ट घडली आहे. त्यामुळे या पावसाने जिल्ह्यातील काही भागात नुकसान केले असले तरी हरणांसह पशुपक्ष्यांसाठी मात्र फायद्याचा ठरला आहे. या उत्तर-पूर्व भागात अडीच हजाराच्या आसपास हरीण आहे तसेच तरस, मोर, लांडगे, खोकड इत्यादी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. (वार्ताहर)