शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अवकाळीने सुटला पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न

By admin | Updated: March 3, 2016 23:02 IST

अवकाळीने सुटला पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न

 ममदापूर : परिसरात वादळी पावसाने हरणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, पाण्याच्या शोधात होणारी भटकंती पुढील एक महिना तरी थांबणार आहे. राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हरणांसाठी पंधरा दिवसातून एकदा पाणवठे भरण्यात येत होते; परंतु कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन तसेच गाय, शेळी, मेंढी आदि पशुपक्षी सर्व पाणवठ्यावर तहान भागविण्यासाठी येत असल्याने नऊ हजार लिटर क्षमतेचे पाणवठे कोरडे पडल्यामुळे हरणे पाण्याच्या शोधात गावाकडे येत असत. त्यामुळे कधी कुत्र्याचा हल्ला, कधी विहिरीत पडून मृत्यूचा सामना करावा लागत असे. मात्र अवकाळीमुळे जंगलातील माती बांध, वनतळे तीस टक्के भरले आहेत. या भागात डोंगर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पाणी लगेच वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे छोटे बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले; परंतु या भागात नुकसान होईल असे काही झाले नाही, परंतु हरणासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ही चांगली गोष्ट घडली आहे. त्यामुळे या पावसाने जिल्ह्यातील काही भागात नुकसान केले असले तरी हरणांसह पशुपक्ष्यांसाठी मात्र फायद्याचा ठरला आहे. या उत्तर-पूर्व भागात अडीच हजाराच्या आसपास हरीण आहे तसेच तरस, मोर, लांडगे, खोकड इत्यादी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. (वार्ताहर)