शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्मार्ट सिटी अभियानामुळे विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: November 29, 2015 00:06 IST

संधीचे करा सोने : मनपा आयुक्तांनीच केले आवाहन

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होण्यासाठी आपण जे जे सुचवू ते ते मान्य होण्यासारखे आहे, त्यामुळे संधीचे सोने करा, असे आवाहन खुद्द महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी पालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करतानाच वाढीव एफएसआय, पूररेषेतील रेड लाइन व ब्लू लाइन दरम्यान बांधकामास परवानगी आदिंबाबत आश्वासने दिली. नगररचनाचे उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुधारित शहर विकास आराखड्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी स्मार्ट सिटी अभियानाबाबत पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापौर- उपमहापौरांसह सर्वपक्षीय गटनेते, पदाधिकारी आणि जुने नाशिक परिसरातील नगरसेवक यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी आयुक्तांनी जुन्या नाशिकचा नक्षाच बदलून टाकणारे सादरीकरण करताना पदाधिकाऱ्यांना काही आश्वासनेही दिली. जुने नाशिकमध्ये पुनर्विकासांतर्गत जुने वाडे, इमारती या विकसित करताना दुपटीने एफएसआय देण्याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आयुक्तांनी सांगितले. सध्या सुधारित शहर विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, त्याला मंजुरी मिळण्यासाठी आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास आराखडा लागू होण्यापूर्वी स्मार्ट सिटी अभियानासाठी होणारी मागणी मान्य होण्यासारखी असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार स्मार्ट सिटी अभियानाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटी अभियानाबाबत महापालिकेकडून सादर होणाऱ्या प्रस्तावात विकास आराखड्यातील तरतुदी, नियमांना छेद देणाऱ्या काही बाबी असतील, तर त्याचा परिणाम विकास आराखड्यावरही होणार आहे. त्यामुळे, प्रस्तावित विकास आराखड्याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी विकास आराखडा तयार केला ते प्रकाश भुक्ते बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मात्र बैठकीपुढे कोणतेही मत प्रदर्शित केले नाही. (प्रतिनिधी)