शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

दोन हंगामांचे दुःख बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 20:41 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात हंगामाला सुरुवात : अर्ली द्राक्ष छाटणीचाही प्रयोग

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असले तरी पालखेड लाभ क्षेत्राखाली तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून द्राक्ष बागेची लागवड केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी अर्ली द्राक्ष छाटणीचा प्रयोग गेला असून द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे.

द्राक्षबाग म्हटले की एप्रिल छाटणीपासून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कामे चालू होतात. छाटणी झाल्यानंतर सपकेन, केन याबरोबरच काडी परिपक्वतेसाठी विविध औषधांच्या मात्रा देऊन साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाची छाटणी करतात. पण गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता, दोन वर्षांत कधी कोरोनाचे संकट, तर कधी निसर्गाचे संकट, यातून वाचून द्राक्षबाग आली तर व्यापाऱ्यांचे संकट, अशा अनेक संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे.

सध्या ढगाळ वातावरण व पावसाची काही प्रमाणात रिमझिम सुरू असतानाही शेतकऱ्यांनी द्राक्ष (ॲक्टोबर) छाटणीचा प्रारंभ केला आहे.पुनश्च हरिओमसलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे द्राक्ष मातीमोल भावाने विकावा लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. चालू द्राक्ष हंगामात उपलब्ध द्राक्षाची टप्प्याटप्प्याने छाटणी करून उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचा मानस आहे. या वर्षीही द्राक्ष पिकास बाजारभाव व निसर्ग कसा असेल हे आज जरी सांगणे शक्य नसले तरी शेतकरी सगळे विसरून पुनश्च कामाला लागला आहे हे नक्कीच..!खर्चात वाढद्राक्ष पीक दिवसेंदिवस खर्चीक बनत चालले असून औषधे, रासायनिक खते, लिक्विड खते यांच्यात झालेली भरमसाट वाढ तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने चार पैसे अधिक देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आलेला आहे. दरवर्षाच्या तुलनेत यंदा अर्ली छाटणीस प्रारंभ केला आहे. दोन वर्षांपासून कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक नफा-तोटा विसरून पुन्हा नव्याने स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागला आहे. त्या ला हवी आहे फक्त आता निसर्गाची साथ..!- सुदाम सौंदाणे, द्राक्ष उत्पादक, शेवगे 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी