शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आदिवासी महामंडळामार्फत एक लाख क्विंटल भाताची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:33 IST

आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला १९४० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. आधारभूत किमतीत भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देखरीप पणन हंगाम : यावर्षी मिळतोय १९४० रुपये क्विंटलचा दर

नाशिक : आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला १९४० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. आधारभूत किमतीत भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत दरवर्षी आधारभूत खरेदी योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी भागांमध्ये भाताची खरेदी केली जाते. खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठीची खरेदी १ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. यासाठी राज्यात विभागनिहाय एकूण २८६ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. सर्वाधिक केंद्र नागपूर विभागात (१७३) असून त्या खालोखाल नाशिक विभागात ५८ खरेदी केंद्रे आहेत. हंगाम सुरु झाल्यानंतर एकूण ५४ केंद्रांवर प्रत्यक्ष माल दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून खरेदीस सुरुवात झाली असून आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार ३१५ .२२ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. भात खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये ३२२९ बिगर आदिवासी तर १५९७ आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे. भात खरेदीला आदिवासी भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून गतवर्षी याच काळात ९० हजार क्विंटलच्या जवळपास भात खरेदी करण्यात आली होती. खरेदी केंद्रांवर भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे अदा करण्यात येत असल्याने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतात. यासाठी शेतकऱ्यांना आगावू नोंदणी करणे बंधनकारक आहे.

चौकट-

शासनाच्या नियमानुसार ज्या भातात आर्द्रतेचे प्रमाण १२ ते १७ टक्के आहे अशाच भाताची खरेदी केंद्रांवर खरेदी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर भात आणताना तो व्यवस्थित वाळवून व साफ करुन आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार