शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:14 IST

पाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.

ठळक मुद्देशेतमाल विक्री : वीस हजारांच्या आतील रक्कम रोख स्वरूपातच मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.केंद्र सरकारने रविवारी (दि.१) बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे सर्व पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे लहान-मोठ्या सर्वच शेतकºयांचे हाल होणार आहे. जर एखाद्या शेतकºयाने बाजार समितीत दोन अडीच क्विंटल माल विक्र ीसाठी आणला व त्याचे तीन चार हजार रुपये आले तर ही रक्कम घेण्यासाठी शेतकºयांना बँकेत चकरा माराव्या लागणार आहे.एवढे करूनही जर रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली नाही तर पुन्हा व्यापाºयांकडे जाऊन चौकशी करावी लागणार असल्याने यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच वेळेचा अपव्यय होणार असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून लहान शेतकºयांना शेतमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी.शासनाचा हा निर्णय लहान शेतकºयांसाठी अन्यायकारक आहे. शासनाने या निर्णयात फेरबदल करून वीस हजारांहून कमी रक्कम रोख स्वरूपात द्यावी. दोन-चार हजार रु पयांसाठी शेतकरी बांधवाला बँकेत चकरा माराव्या लागणार आहे. लहान रक्कम रोख स्वरूपात द्यावी व मोठी रक्कम असेल तरच बँकेत ट्रान्स्फर करावी.- मोहन शेलार, सभापती,उपकृषी उत्पन्न बाजार समिती, पाटोदा शासनाचे हे धोरण योग्य असून, शेतकºयांच्या खात्यावर शेतमाल विक्र ीची रक्कम बँक खात्यात परस्पर जमा होणार आहे; मात्र ही रक्कम शेतमाल विक्र ी झालेल्या दिवशीच खात्यावर जमा व्हावी. शेतकºयांना व्यापाºयांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकºयांकडे असलेले कर्ज बँकांनी खात्यातून परस्पर वळते करू नये तरच हे धोरण शेतकरी हिताचे ठरेल.- समाधान सावंत, शेतकरी, खैरगव्हाणसरकारचे हे शेतमाल विक्र ी धोरण हे शेतकरी हिताचे असले तरी लहान शेतकºयांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. शेतमालाची रक्कम खात्यावर जमा झाली तरी बँक शेतकºयांकडे असलेल्या कर्जापोटी ही रक्कम परस्पर वळती करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडणार असल्याने शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी. - भास्कर नाना शेळके,शेतकरी, ठाणगावशेतमाल विक्र ीची रक्कम परस्पर बँक खात्यावर जमा होणार असल्याने व्यापाºयांकडून होणारी फसवणूक यामुळे टळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो.- उत्तम पाचपुते, शेतकरी, पाटोदा