शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:14 IST

पाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.

ठळक मुद्देशेतमाल विक्री : वीस हजारांच्या आतील रक्कम रोख स्वरूपातच मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.केंद्र सरकारने रविवारी (दि.१) बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे सर्व पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे लहान-मोठ्या सर्वच शेतकºयांचे हाल होणार आहे. जर एखाद्या शेतकºयाने बाजार समितीत दोन अडीच क्विंटल माल विक्र ीसाठी आणला व त्याचे तीन चार हजार रुपये आले तर ही रक्कम घेण्यासाठी शेतकºयांना बँकेत चकरा माराव्या लागणार आहे.एवढे करूनही जर रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली नाही तर पुन्हा व्यापाºयांकडे जाऊन चौकशी करावी लागणार असल्याने यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच वेळेचा अपव्यय होणार असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून लहान शेतकºयांना शेतमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी.शासनाचा हा निर्णय लहान शेतकºयांसाठी अन्यायकारक आहे. शासनाने या निर्णयात फेरबदल करून वीस हजारांहून कमी रक्कम रोख स्वरूपात द्यावी. दोन-चार हजार रु पयांसाठी शेतकरी बांधवाला बँकेत चकरा माराव्या लागणार आहे. लहान रक्कम रोख स्वरूपात द्यावी व मोठी रक्कम असेल तरच बँकेत ट्रान्स्फर करावी.- मोहन शेलार, सभापती,उपकृषी उत्पन्न बाजार समिती, पाटोदा शासनाचे हे धोरण योग्य असून, शेतकºयांच्या खात्यावर शेतमाल विक्र ीची रक्कम बँक खात्यात परस्पर जमा होणार आहे; मात्र ही रक्कम शेतमाल विक्र ी झालेल्या दिवशीच खात्यावर जमा व्हावी. शेतकºयांना व्यापाºयांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकºयांकडे असलेले कर्ज बँकांनी खात्यातून परस्पर वळते करू नये तरच हे धोरण शेतकरी हिताचे ठरेल.- समाधान सावंत, शेतकरी, खैरगव्हाणसरकारचे हे शेतमाल विक्र ी धोरण हे शेतकरी हिताचे असले तरी लहान शेतकºयांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. शेतमालाची रक्कम खात्यावर जमा झाली तरी बँक शेतकºयांकडे असलेल्या कर्जापोटी ही रक्कम परस्पर वळती करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडणार असल्याने शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी. - भास्कर नाना शेळके,शेतकरी, ठाणगावशेतमाल विक्र ीची रक्कम परस्पर बँक खात्यावर जमा होणार असल्याने व्यापाºयांकडून होणारी फसवणूक यामुळे टळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो.- उत्तम पाचपुते, शेतकरी, पाटोदा