शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डाळींबबागा उद्ध्वस्त

By admin | Updated: July 11, 2014 00:50 IST

डाळींबबागा उद्ध्वस्त

विंचुरे : आधीच पावसाने पाठ फिरवलेली असताना डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने बागलाण परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे इतर पिके बाजूला सारून शेतकरी डाळिंबाची लागवड करत आला आहे. मात्र बहार धरल्यानंतर विहिरींनी तळ गाठल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी टँकरद्वारे डाळींब बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींना पाणी आहे. त्यांच्याकडून पाणी विकत घेऊन मार्च महिन्यापासून बागांना पाणी देत आहेत. जून महिन्यात पाऊस येईल या अपेक्षेने बागा वाचवल्या मात्र जुलै मध्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने डाळिंबाना पाण्यासाठी वाढीव पैसे देऊन अजूनही पाणी विकत घ्यावे लागत आहे.मार्च महिन्यात टँकरद्वारे पाणी देण्यासाठी प्रतिटँकर ६०० रुपये मोजावे लागायचे तसेच दिवसांतून तीन ते चार टँकर पाणी टाकावे लागायचे मात्र आजपर्यंत पाऊस न झाल्यामुळे टँकरच्या पाण्याचे ‘भाव’ वाढून ते एक हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. सध्या दिवसागणिक पाच ते सहा टँकर पाणी द्यावे लागत आहे.एवढा खर्च करून वाचवलेल्या बागांवर आता तेल्या रोगाने थैमान घातले आहे. विंचुरे, वटार, डोंगरेज, वनोली आदि गावांमध्ये तेल्याने डाळींबबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही तोच तेल्या रोगाच्या आक्रमणामुळे महागड्या औषधांचा तसेच टँकरद्वारे पाणी टाकण्याचा खर्चसुद्धा निघेल का, असा सवाल बळीराजाला सतावतो आहे.मार्च महिन्यात झालेली गारपीट, हातचा गेलेला कांदा, केविलवाणा प्रयत्न करून वाचविलेल्या डाळींबबागा, त्यावरील तेल्या रोगाचा झालेला प्रादुर्भाव गारपीटग्रस्तांना शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत, कांद्याचे वाढलेले निर्यातमूल्य, त्यामुळे कवडीमोल भावात, विकला जाणारा कांदा आणि या सर्वांना दुष्काळात तेरावा महिना असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)गुरुपौर्णिमा महोत्सव नाशिक : येथील विश्व जागृती मिशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि.१२) गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूररोड येथे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ओंकारजप, सामुदायिक प्रार्थना, गुरुचरणपादुका पूजन, भजन, आरती आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या महोत्सवात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन ओंकारसिंह राजपूत, करमचंदानी, शाम ढेडिया, भगवानभाई अग्रवाल, अभिमन्यू सूर्यवंशी, वंजारी, रमेश कासार आदिंनी केले आहे.