शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दारणेच्या पाण्यासाठी कॉँग्रेसचा पूजापाठ व आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 17:45 IST

सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला.

सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला. सदर कलश तालुकाभर फिरवून जनजागृती करुन पाण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘पाणी आमच्या हक्काचं..’ अशा घोषणा देत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली.कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गोपाळ गायकर, कैलास दातीर, कमलाकर शेलार, दामू शेळके, पुंजाराम हारक, अर्जून घोरपडे, बाळासाहेब दळवी, तानाजी भोर, नामदेव वाजे, कचरु पवार, बबन जाधव यांच्यासह कॉँग्रेसचे कार्यकर्ते या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.मराठवाड्यापेक्षाही भयानक दुष्काळ सिन्नर तालुक्यात असतांना हक्काचे पाणी सिन्नरला डावलून नेले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. भौगोलिकदृष्टया सिन्नर तालुका उंचावर असल्याने व आत्तापर्यंत महत्त्वकांक्षी नेतृत्त्व न मिळाल्याने सिन्नरकरांना १५ किलोमीटर अंतरावर दूर असणाऱ्या दारणा नदीपात्रातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले. आत्तापर्यंत शेतकºयांची पाण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न बळीराजासमोर आहे. दारणाचे पाणी कोनांबे धरणात टाकून देवनदी व देवनदीच्या उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे काढून शेती सुजलाम् सुफलाम करता येऊ शकते असे शिंदे यांनी सांगितले. तसेच म्हाळुंगी नदीचे पाणी पिंपळे शिवारात तवल्या बंधाºयात अडवून डुबेरेच्या जगबुडी बंधाºयात टाकून या भागातील शेतीला फायदा होऊ शकतो. मात्र सक्षम नेतृत्त्व न लाभल्याने तालुका शेतीच्या पाण्यापासून वंचित असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी शेतीसाठी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी सदर आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. दारणा नदीपात्रात भरलेला कलश तालुकाभर फिरवून शेतीचे पाणी मिळावे यासाठी जनजागृती करणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी