शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

By suyog.joshi | Updated: September 21, 2023 14:12 IST

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात नागरिकांनी निर्माल्य आपल्या जवळपासच्या कोणत्याही नदीपात्रात टाकू नये. महानगर पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकावे. प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

यावेळी दुर्गुळे म्हणाले, नाशिक शहरामधील हवेचे प्रदूषण शक्यतो करून धूलीकण वाढल्याने दिसून येते. यामध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक यामुळे धुळीचे कण पुन्हा पुन्हा हवेमध्ये तरंगत राहतात. तसेच, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, जुन्या वस्तू पाडणे यामधून निघालेला चिखल यांच्या वाहतुकीमुळे धूलीकण वाढण्याची शक्यता असते. 

शहरात होणारी वाहतूक कोंडी ती सुद्धा प्रदूषणात भर घालते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची नियमित दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळणे व वाहतुकीचे सामान नेणारी नियमावली करून बंदिस्त वाहतूक करणे. वाहतूक योग्य नियंत्रण करणे आदी गोष्टी आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूर व अंबड औद्योगिक परिसरामध्ये उद्योगामध्ये फरनेस ऑइल वापरणे बंदी आहे. 

त्यामुळे उद्योगाने हरित इंधन तसेच, एलपीजी, सीएनजी या इंधनाचा वापर करण्याबाबत पुढाकार घेतला असून, मोठ्या तसेच मध्यम दहा ते १२ उद्योगांनी त्यांच्या उद्योगामध्ये हरित इंधनाचा वापर सुरू केला आहे. तसेच सातपूर, अंबड परिसरामध्ये गॅस पाइपलाइन याद्वारे उद्योगांना, इंधनपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांनी पाइपलाइन केलेली आहे. तसेच सदर इंधनामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रियानाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असून, प्रक्रियाकृत सांडपाणी हे पुन्हा उद्योगामध्ये काही प्रमाणात वापरले जाते. तर काही उर्वरित पाणी हे बागांसाठी वापरले जाते. तसेच ११० उद्योगांनी त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे पाणी हे पुन:श्च वापरून न वापरणे योग्य पाणी त्याचे बाष्पीभवन करून शून्य निकष प्रक्रिया केली जाते. परंतु औद्योगिक परिसरामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी (टाॅयलेट व इतर वापर) याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच ते वाहून नेण्यासाठी कोणतीही सयंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा ते घरगुती सांडपाणी हे व आजूबाजूचे सांडपाणी हे नाल्यातून नदीत मिसळते. त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दुर्गुळे यांनी सांगितले.

मनपाने सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत करावेबराच वेळा जलमल वाहून नेणाऱ्या वाहिन्या या फुटल्यामुळे किंवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. तसेच बऱ्याच घरगुती संकुलांचे सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेशी जोडले नसल्याने ते पाणी नदीत मिसळते. त्यावर मनपाने तत्काळ उपाययाेजना करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने औद्यागिक सांडपाणी यंत्रणा (सीईटीपी) ही लवकरात लवकर उभारणी करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेली महानगरपालिकेचे जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अद्ययावत करणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी हे इतर दुय्यम वापरासाठी तसेच रस्ते सफाई किंवा दुय्यम औद्योगिक वापर किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा पुन:श्च वापर करता येऊ शकतो, असेही ते शेवटी म्हणाले.

पर्यावरण जागृतीराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वच्छ अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यातून हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करावा, असा संदेश देण्यात आला. राज्यभरात सुमारे २० हजार कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक