शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

By suyog.joshi | Updated: September 21, 2023 14:12 IST

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात नागरिकांनी निर्माल्य आपल्या जवळपासच्या कोणत्याही नदीपात्रात टाकू नये. महानगर पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकावे. प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

यावेळी दुर्गुळे म्हणाले, नाशिक शहरामधील हवेचे प्रदूषण शक्यतो करून धूलीकण वाढल्याने दिसून येते. यामध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक यामुळे धुळीचे कण पुन्हा पुन्हा हवेमध्ये तरंगत राहतात. तसेच, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, जुन्या वस्तू पाडणे यामधून निघालेला चिखल यांच्या वाहतुकीमुळे धूलीकण वाढण्याची शक्यता असते. 

शहरात होणारी वाहतूक कोंडी ती सुद्धा प्रदूषणात भर घालते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची नियमित दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळणे व वाहतुकीचे सामान नेणारी नियमावली करून बंदिस्त वाहतूक करणे. वाहतूक योग्य नियंत्रण करणे आदी गोष्टी आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूर व अंबड औद्योगिक परिसरामध्ये उद्योगामध्ये फरनेस ऑइल वापरणे बंदी आहे. 

त्यामुळे उद्योगाने हरित इंधन तसेच, एलपीजी, सीएनजी या इंधनाचा वापर करण्याबाबत पुढाकार घेतला असून, मोठ्या तसेच मध्यम दहा ते १२ उद्योगांनी त्यांच्या उद्योगामध्ये हरित इंधनाचा वापर सुरू केला आहे. तसेच सातपूर, अंबड परिसरामध्ये गॅस पाइपलाइन याद्वारे उद्योगांना, इंधनपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांनी पाइपलाइन केलेली आहे. तसेच सदर इंधनामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रियानाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असून, प्रक्रियाकृत सांडपाणी हे पुन्हा उद्योगामध्ये काही प्रमाणात वापरले जाते. तर काही उर्वरित पाणी हे बागांसाठी वापरले जाते. तसेच ११० उद्योगांनी त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे पाणी हे पुन:श्च वापरून न वापरणे योग्य पाणी त्याचे बाष्पीभवन करून शून्य निकष प्रक्रिया केली जाते. परंतु औद्योगिक परिसरामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी (टाॅयलेट व इतर वापर) याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच ते वाहून नेण्यासाठी कोणतीही सयंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा ते घरगुती सांडपाणी हे व आजूबाजूचे सांडपाणी हे नाल्यातून नदीत मिसळते. त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दुर्गुळे यांनी सांगितले.

मनपाने सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत करावेबराच वेळा जलमल वाहून नेणाऱ्या वाहिन्या या फुटल्यामुळे किंवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. तसेच बऱ्याच घरगुती संकुलांचे सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेशी जोडले नसल्याने ते पाणी नदीत मिसळते. त्यावर मनपाने तत्काळ उपाययाेजना करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने औद्यागिक सांडपाणी यंत्रणा (सीईटीपी) ही लवकरात लवकर उभारणी करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेली महानगरपालिकेचे जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अद्ययावत करणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी हे इतर दुय्यम वापरासाठी तसेच रस्ते सफाई किंवा दुय्यम औद्योगिक वापर किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा पुन:श्च वापर करता येऊ शकतो, असेही ते शेवटी म्हणाले.

पर्यावरण जागृतीराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वच्छ अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यातून हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करावा, असा संदेश देण्यात आला. राज्यभरात सुमारे २० हजार कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक