शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

By suyog.joshi | Updated: September 21, 2023 14:12 IST

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात नागरिकांनी निर्माल्य आपल्या जवळपासच्या कोणत्याही नदीपात्रात टाकू नये. महानगर पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकावे. प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

यावेळी दुर्गुळे म्हणाले, नाशिक शहरामधील हवेचे प्रदूषण शक्यतो करून धूलीकण वाढल्याने दिसून येते. यामध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक यामुळे धुळीचे कण पुन्हा पुन्हा हवेमध्ये तरंगत राहतात. तसेच, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, जुन्या वस्तू पाडणे यामधून निघालेला चिखल यांच्या वाहतुकीमुळे धूलीकण वाढण्याची शक्यता असते. 

शहरात होणारी वाहतूक कोंडी ती सुद्धा प्रदूषणात भर घालते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची नियमित दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळणे व वाहतुकीचे सामान नेणारी नियमावली करून बंदिस्त वाहतूक करणे. वाहतूक योग्य नियंत्रण करणे आदी गोष्टी आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूर व अंबड औद्योगिक परिसरामध्ये उद्योगामध्ये फरनेस ऑइल वापरणे बंदी आहे. 

त्यामुळे उद्योगाने हरित इंधन तसेच, एलपीजी, सीएनजी या इंधनाचा वापर करण्याबाबत पुढाकार घेतला असून, मोठ्या तसेच मध्यम दहा ते १२ उद्योगांनी त्यांच्या उद्योगामध्ये हरित इंधनाचा वापर सुरू केला आहे. तसेच सातपूर, अंबड परिसरामध्ये गॅस पाइपलाइन याद्वारे उद्योगांना, इंधनपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांनी पाइपलाइन केलेली आहे. तसेच सदर इंधनामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रियानाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असून, प्रक्रियाकृत सांडपाणी हे पुन्हा उद्योगामध्ये काही प्रमाणात वापरले जाते. तर काही उर्वरित पाणी हे बागांसाठी वापरले जाते. तसेच ११० उद्योगांनी त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे पाणी हे पुन:श्च वापरून न वापरणे योग्य पाणी त्याचे बाष्पीभवन करून शून्य निकष प्रक्रिया केली जाते. परंतु औद्योगिक परिसरामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी (टाॅयलेट व इतर वापर) याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच ते वाहून नेण्यासाठी कोणतीही सयंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा ते घरगुती सांडपाणी हे व आजूबाजूचे सांडपाणी हे नाल्यातून नदीत मिसळते. त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दुर्गुळे यांनी सांगितले.

मनपाने सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत करावेबराच वेळा जलमल वाहून नेणाऱ्या वाहिन्या या फुटल्यामुळे किंवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. तसेच बऱ्याच घरगुती संकुलांचे सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेशी जोडले नसल्याने ते पाणी नदीत मिसळते. त्यावर मनपाने तत्काळ उपाययाेजना करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने औद्यागिक सांडपाणी यंत्रणा (सीईटीपी) ही लवकरात लवकर उभारणी करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेली महानगरपालिकेचे जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अद्ययावत करणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी हे इतर दुय्यम वापरासाठी तसेच रस्ते सफाई किंवा दुय्यम औद्योगिक वापर किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा पुन:श्च वापर करता येऊ शकतो, असेही ते शेवटी म्हणाले.

पर्यावरण जागृतीराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वच्छ अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यातून हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करावा, असा संदेश देण्यात आला. राज्यभरात सुमारे २० हजार कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक