शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आता झाडे तोडण्यासाठी जनहित याचिका

By admin | Updated: October 9, 2015 23:06 IST

गंगापूररोडवासीयांचा निर्णय : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पन्नास हजार पत्रे पाठविणार

नाशिक : रस्ता रूंदीकरणात बाधीत झाडे तोडू नये यासाठी दाखल झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या याचिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता झाडे तोडण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय गंगापूररोड रस्ता विकास कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे उच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींना पन्नास हजार पत्रे पाठवून अपघाताला कारणीभूत असणारी झाडे तोडावी यासाठी साकडे घालण्याचेही ठरविण्यात आले.गंगापूर रस्ता विकास कृती समितीची बैठक शुक्रवारी सायंकाळी नंदनवन लॉन्स येथे झाली. उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, नगरसेवक विक्रांत मते आणि विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापालिकेने रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर रूंदीकरणात बाधीत होणारी झाडे तोडण्याची तयारी केली होती. केवळ जेहान सर्कल ते गंगापूर गाव या मार्गावरील साडेतीनशे झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने झाडे तोडण्यास केलेली मनाई आणि त्यानंतर घातलेल्या अटी-शर्ती तसेच विशिष्ट झाडे तोडण्यास नाकारलेली परवानगी यामुळे आजही गंगापूररोडचे रूंदीकरण पूर्ण झालेले नाही. तथापि, पर्यावरण रक्षण महत्त्वाचे की, नागरिकांचे जीवन असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करीत ही समिती स्थापन केली आहे. रूंदीकरणातील झाडे तोडण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी असे ठरवतानाच अपघात होत असल्याने झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी पन्नास हजार पत्रे न्यायमूर्तींना पाठवून ही पत्रे जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्यावेत, असे मत व्यक्त केले. बैठकीस महेश हिरे, के.जी. मोरे, डॉ. श्याम अष्टेकर, सचिन मोरे, अशोक खुटाडे, शशिकांत टर्ले, वैशाली देवरे, संतोष गायकर, अ‍ॅड. पेखळे, संदीप फडतरे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)