शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:38 IST

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली.

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची पाहणी केली, बागलान दौºयावर असताना ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील १७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणीसाठी त्यांनी येथे भेट दिली. द्राक्ष उत्पादक नंदकिशोर भावराव अहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग पूर्णत: सततच्या पावसामुळे नष्ट झाल्याने लाखो रूपयांचा खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याने या बागेची पाहणी शेट्टी यांनी केली.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावेळी श्री.शेट्टी यांनी सांगितले की, कोरड्या पेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पिक विमा काढला आहे. तसेच ज्यांचे पीक विमा नाहीत परंतु सततच्या झालेल्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी बरोबरच विजिबलमाफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. शेतकºयांच्या प्रश्नासाठी सत्ता कुणाचीही येवो, शेतकर्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसुड ओढु, असा इशारा शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप, साहेबराव मोरे, कुबेर जाधव, सुभाष अहिरे, तुषार शिरसाठ, राजू शिरसाठ, रमेश आहिरे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तंटामुक्ती समतिीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक