शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

नदीपात्राला संरक्षक जाळ्या

By admin | Updated: January 22, 2017 23:03 IST

प्रदूषण टाळण्यासाठी उपाय : उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : न्यायालयाने आदेश देऊनही नदीपात्रात कपडे आणि वाहने धुतली जात असल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण थांबत नसून त्यावर उपाय करण्यासाठी आता नदीपात्राच्या काही भागांत संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात राजेश पंडित यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केली असून, त्याअनुषंगाने न्यायालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली असून, समितीची दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येते त्यानुसार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. नदीपात्रात वाहने आणि कपडे धुण्यास प्रतिबंध केला असतानादेखील हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांनी नियम भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेस, असे निर्देशित केले. महापालिकेने गोदावरी नदीच्या काठी निर्माल्य आणि अन्य कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी म्हणजेच निर्माल्य कलश आणि कचरापेटीची व्यवस्था करावी आणि सर्व कचरा सकाळी ११ वाजता आणि रात्री नऊ वाजता उचलावा, तसेच अधिक मनुष्य बळाची व्यवस्था करून पाणवेली काढण्याची व्यवस्था करावी, गोदावरी नदीच्या तीरावरील मलजल वाहून नेणाऱ्या आणि पुरामुळे फुटलेल्या सर्व मलवाहिका आणि चेंबर्स दुरुस्त करण्याची व्यवस्था करावी, असे ठरविण्यात आले. त्र्यंबकरोडवर पिंपळगाव येथे मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी तातडीने भूसंपादन करावे, अशी महापालिकेला सूचना करण्यात आली. तर नीरीने भूजलस्त्रोतांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, तसचे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.