शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्राला संरक्षक जाळ्या

By admin | Updated: January 22, 2017 23:03 IST

प्रदूषण टाळण्यासाठी उपाय : उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : न्यायालयाने आदेश देऊनही नदीपात्रात कपडे आणि वाहने धुतली जात असल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण थांबत नसून त्यावर उपाय करण्यासाठी आता नदीपात्राच्या काही भागांत संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात राजेश पंडित यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केली असून, त्याअनुषंगाने न्यायालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली असून, समितीची दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येते त्यानुसार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. नदीपात्रात वाहने आणि कपडे धुण्यास प्रतिबंध केला असतानादेखील हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांनी नियम भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेस, असे निर्देशित केले. महापालिकेने गोदावरी नदीच्या काठी निर्माल्य आणि अन्य कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी म्हणजेच निर्माल्य कलश आणि कचरापेटीची व्यवस्था करावी आणि सर्व कचरा सकाळी ११ वाजता आणि रात्री नऊ वाजता उचलावा, तसेच अधिक मनुष्य बळाची व्यवस्था करून पाणवेली काढण्याची व्यवस्था करावी, गोदावरी नदीच्या तीरावरील मलजल वाहून नेणाऱ्या आणि पुरामुळे फुटलेल्या सर्व मलवाहिका आणि चेंबर्स दुरुस्त करण्याची व्यवस्था करावी, असे ठरविण्यात आले. त्र्यंबकरोडवर पिंपळगाव येथे मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी तातडीने भूसंपादन करावे, अशी महापालिकेला सूचना करण्यात आली. तर नीरीने भूजलस्त्रोतांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, तसचे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.