शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

प्रपोज डे लाच प्रियकराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:58 IST

नाशिक :  व्हॅलेंटाइन वीक एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात प्रपोज डे लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देलग्नास नकार मिळाल्याने टोकाचे पाऊल : इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीतील धक्कादायक घटना

नाशिक :  व्हॅलेंटाइन वीक एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात प्रपोज डे लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) या युवकाने त्याचे प्रेम प्रेयसीकडे व्यक्त करत लग्नाची मागणी घातली; मात्र तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून अजय याने आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी किरण श्रावण गिरी याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद प्रथमदर्शनी केली आहे.अजय याचा रूम पार्टनर किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना अजय याने तो येण्यापूर्वीच पंख्याला दोरी बांधून त्याअधारे गळफास घेत आपले जीवन संपविले. जेव्हा किरण हा दुपारी घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी इमारतीमधील अन्य रहिवाशांनीही धाव घेत दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र दरवाजा उघडत नसल्याने रहिवाशांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळेतच बिट मार्शल तेथे दाखल झाले व त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावले असता अजयने गळफास घेतल्याचे लक्षात आले. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत अजयला तिच्या मैत्रिणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत. गुन्हा दाखल केला आहे.अजय होता इंजिनिअरअजय याने बॅचलर ऑफ टेक्नॉलोजीची पदवी घेतली असून, तो नाशिक येथील एका आरओ उपकरण विक्री करणाऱ्या कंपनीत नोकरी करत होता. मागील चार महिन्यांपासून अजय हा राजसारथी सोसायटीत त्याचा मित्र किरणसोबत भाडेतत्त्वावर राहत होता. तो मूळ अहमदनगरमधील पाथर्डी येथील होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहेत. अजयने टोकाचे पाऊल उचलून स्वत:चे जीवन संपविल्याने थोरात कुटुंबीयांसह त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, दाजी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात अहमदनगरच्या पाथर्डी या मूळ गावी त्याचा अंत्यविधी पार पडला.