शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

२१ गावांचे टॅँकरसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:31 IST

सुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देसात टॅँकर मंजूर : तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरूच

श्याम खैरनार ।लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव पाणीटंचाई विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. पाच टॅँकर शासकीय तर दोन टॅँकर खासगी आहेत. मात्र यावेळी जुने व तकलादू टॅँकर न पाठवता नवे किंवा सुस्थितीतील टॅँकर पाठविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मोहनराव गांगुर्डे यांनी केली आहे. मागवण्यात आलेले पाणी टॅँकर सॅनेटाइझ केल्यानंतर या टॅँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना येत्या दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा केला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यात एकही संशयित रु ग्ण नसला तरीदेखील स्थानिक प्रशासन कोरोनासोबतच तालुक्यातील पाणीटंचाईवरदेखील लक्ष ठेवून आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त होताच सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. हे सर्व टॅँकर निर्जंतुक केले जाणार असून, टॅँकरवर स्थानिक चालक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यापुढे जसे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल.- विजय सूर्यवंशी, तहसीलदार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षसुरगाणा तालुक्यात दरवर्षी ठरावीक गावे व पाड्यांना पाणीटंचाईचा सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निर्माण झाली की टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव द्यायचा. मग टॅँकर मंजूर होऊन पाऊस पडेपर्यंत ईकडून तिकडून पाणी उपलब्ध करून या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करायचा, गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. काही महिलांनी तर हा प्रकार पिढ्यान् पिढ्या चालू असल्याचे सांगितले. निवडणुकांत अनेक नवे-जुने निवडून येतात, मात्र कुणाही प्रतिनिधिनीने पाणीटंचाई कायमची मिटवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हेवेदावे विसरून गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही पाणीटंचाई कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.