शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

प्रस्ताव दाखल : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महापालिकेचा लागणार कस

By admin | Updated: July 15, 2015 23:56 IST

प्रस्ताव दाखल : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महापालिकेचा लागणार कस

प्रस्ताव दाखल : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महापालिकेचा लागणार कसनाशिक : केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी होण्यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव दाखल केल्यानंतर आता संबंधित पुरावे सादर करण्याची तयारी पूर्ण केली असली तरी, दुसऱ्या टप्प्यात देशभरातील शंभर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महापालिकेचा कस लागणार आहे. स्पर्धेत देशभरातील केवळ २० शहरांचीच निवड होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिकचा मार्ग खडतरच असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीत सहभागी होण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. दोन टप्प्यात राबविल्या जाणाऱ्या या अभियानात पहिल्या टप्प्यात दहा शहरांची निवड केली जाणार असून, त्यांची शिफारस केंद्राकडे केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धा होणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने १० जुलैला गुणांक तक्ता भरून पाठविला होता. त्यात महापालिकेने आपले गुणांकन ८२.५० टक्के नोंदवलेले आहे. आता गुणांकनानुसार राबविलेल्या प्रकल्पांसंबंधीचे पुरावे दि. १६ जुलैपर्यंत सादर करावयाचे असल्याने महापालिकेने त्याचीही तयारी पूर्ण केली आहे. याशिवाय स्मार्ट सिटीमध्ये सहभाग नोंदविणारा सर्वसाधारण सभेचा ठराव आवश्यक असल्याने आयुक्तांकडून त्याबाबतचा प्रस्तावही शुक्रवारी होणाऱ्या महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने गुणांक तक्ता तर सादर केला. परंतु पुढच्या टप्प्यात सामील होताना प्रस्ताव कसा असला पाहिजे, याविषयी भरभक्कम सूचना असल्याने महापालिकेची प्रस्ताव तयार करताना मोठी कसोटी लागणार आहे. गुणांक तक्ताच ८२.५० टक्क्यांपर्यंत आणताना महापालिकेचा कस लागला. दरम्यान, पुढच्या टप्प्यात देशभरातील शंभर शहरांमध्ये स्पर्धा होणार असली तरी, पहिल्या वर्षी त्यातील केवळ २० शहरांचीच निवड केली जाण्याची शक्यता असून त्यात सुरत, बडोदा, कोचिन, कोईमतूर, लखनऊ, कोलकाता, लुधियाना, श्रीनगर, बंगलोर आदिंबरोबरच मुंबई, पुणे, नागपूर आदि बड्या शहरांबरोबर नाशिकला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील मार्ग खडतरच असल्याचे बोलले जात आहे. स्मार्ट सिटीत टिकाव धरण्यासाठी प्रशासनाची जशी कसोटी लागणार आहे त्याचबरोबर स्थानिक राजकीय इच्छाशक्तीचाही कस लागणार आहे. राजकीय पातळीवर होणारी लॉबिंगही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. शहरात मनसेच्या हाती महापालिका असताना आणि युती सरकार सत्तारूढ झाल्यापासून मनसेची वेगवेगळ्या स्तरावर केली जाणारी कोंडी पाहता स्मार्ट सिटीत नाशिकचा नंबर पहिल्या दहामध्ये लागण्याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)