शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दारणातील पंपिंगची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:03 IST

दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने दारणा धरणातून यंदा ४०० दलघफू ऐवजी ३०० दलघफू पाणी आरक्षणाची केलेली मागणी जलसंपदा विभागाकडून फेटाळून लावली जाण्याची शक्यता असून, गंगापूर धरणातून १०० दलघफू वाढीव आरक्षण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षाकरिता जलसंपदा विभागाकडे ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. त्यात गंगापूर धरणातून ४३०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाचा समावेश आहे. सन २०१६-१७ या वर्षात महापालिकेने गंगापूर धरणातून ३९५० दलघफू, तर दारणातून ३०२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. यंदा दारणातून ४०० दलघफू ऐवजी त्यातील १०० दलघफू पाणी आरक्षण गंगापूर धरणातून देण्याचा आग्रह महापालिकेने धरला असला तरी, महापालिकेची मागणी मान्य होण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने दारणा धरणातून पाण्याची अधिकाधिक उचल करता यावी याकरिता दारणा धरणात पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला असून, अमृत योजनेंतर्गत निधीची अपेक्षा करण्यात आली आहे. सन २०१५ मध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी महापालिकेने दारणा धरणातील पाइपलाइन आतपर्यंत नेली होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे २०० दलघफू पाण्याची होणारी उचल ३०० दलघफूवर जाऊन पोहोचली होती. आता दारणा धरणातील ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पंपिंग स्टेशनची क्षमता १०० दशलक्ष लिटर्स क्षमता करण्याचा प्रस्ताव असून, अमृत योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. सदर क्षमता वाढल्यास नाशिकरोड विभागाला दारणातून बारमाही पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.