शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्रामपंचायतींच्या निर्मितीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:56 IST

नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.सुरगाणा, बागलाण, कळवण, दिंडोरी या चार तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींच्या विभाजनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या ग्रुप ग्रामपंचायतीतून चंद्रपूर, चिंचले, पांगारणे, सोनगीर, उदमाळ या नवीन, तर हट्टी ग्रामपंचायतीतून करवंदे, श्रीभुवन, मोठा माळ या तीन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील दºहाणे ग्रामपंचायतीतून इंदिरानगरची निर्मिती करण्यात येणार आहे. कळवण तालुक्यातील पिंपळे बु.मधून सावरपाडा, मळगाव खु.मधून मळगाव बु; दरेभणगीमधून धनेर दिगर, वाडी बु. मधून एकलहरे, नाळीद ग्रामपंचायतीतून भांडणे (पिंपळे) व इन्शी या दोन ग्रामपंचायतींची तर आंबेवणी ग्रामपंचायतीतून घोडेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात येणार आहे.अशी होते नवीन ग्रामपंचायत निर्मितीबिगर आदिवासी तालुक्यात ज्या गावांची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असेल व आदिवासी तालुक्यातील गावाची लोकसंख्या एक हजार असेल अशा गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत निर्मिती करता येऊ शकते अथवा ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जाते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत