शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:15 IST

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्वीकारले असून, शासनाकडे आणखी ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केला आहे.

ठळक मुद्दे४५० कोटींची मागणी २०२२ चे उद्दिष्ट २०१९ मध्येच करणार पूर्ण

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्वीकारले असून, शासनाकडे आणखी ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केला आहे.नाशिक जिल्ह्णाने घरकुल कामांमध्ये मोठी झेप घेतली असून, चार महिन्यांपूर्वी घरकुल योजनेत देशात २२५ व्या क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ४०व्या क्रमांकावर आला आहे. तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्णात घरकुल बांधकामाची प्रगती पाहता यापेक्षा अधिक घरकुलांची कामे होऊ शकतात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेने एकूण ३० हजार घरकुलांचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, या योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर आहे. जिल्ह्णात घरकुल बांधकामाची प्रगती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अतिरिक्त ३० हजार घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्णास उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.नाशिक जिल्ह्णाकरिता सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी एकूण २९,०८२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यापैकी २०१६-१७, २०१७-१८ या वर्षातील २३६१० उद्दिष्टापैकी २०७८८ (८८ टक्के) घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २८२२ घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. सन २०१८-१९ मधील ५४४३ घरकुल कामांपैकी ९३ कामे पूर्ण झाली असून, आॅगस्ट अखेर सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार डॉ. गिते यांनी केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही अनुकूलता दर्शविली असून, त्यांच्या सहकार्याने सदरचे उद्दिष्ट येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचेही गिते यांनी सांगितले.घरकुल योजनेबाबत वेळोवेळी आढावा बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेण्यात येत आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या बैठकीत सर्वांनी अतिरिक्त उद्दिष्ट पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याने ३० हजार अतिरिक्त उद्दिष्टाची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ४५०कोटी रु पयांचा निधी लागणार असून, २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे अतिरिक्त मागणी केल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.