शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:22 IST

कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.

नाशिक : कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.  सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकरी व वेगवेगळ्या शेतकरी संघटना आजही आग्रही आहोत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरातून बळीराजा मिरवणूक काढली. सुकाणू समितीने सरकारवर कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा आरोप केला असून, सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  सरकारने शेतकºयांना सरकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात एक कोटी चार लाख शेतकरी आहेत. परंतु सरकारच्या जाचक अटींमुळे सुमारे ५८ लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्जच करू शकलेले नाही, तर अर्ज करणाºया अनेक शेतकºयांनाही या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे वगळले जाणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे  राज्यात कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहे.  या आत्महत्यांना सरकारचे शेती विरोधी घोरण जबाबदार असून, अशा शेती व शेतकरी विरोधी धोरणातील अंमलबजावणी करणाºया सरकारवर शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने बळीराजा मिरवणुकीच्या माध्यमातून केली असून, या मागण्यांचे निवेदनही पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सुकाणू समितीचे निवेदन स्वीकारले. सुकाणू समितीने काढलेल्या या बळीराजाची मिरवणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, किसानसभा आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील शेतकºयांनी सहभाग घेत आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.