शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

त्र्यंबकेश्वर देवस्थानासह व्यावसायिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:34 IST

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजाविधी व ब्रह्मगिरी फेरीला श्रावण महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. परिणामी श्रावणात देवस्थान ट्रस्टसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजाविधी व ब्रह्मगिरी फेरीला श्रावण महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. परिणामी श्रावणात देवस्थान ट्रस्टसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.कोरोनामुळे शहरात गर्दी हाऊ नये, भाविकांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने त्र्यंबक देवस्थान चार महिन्यांपासून बंद केले आहे. येथे येणाऱ्या बसेस, खासगी वाहने बंद केली आहेत. रस्त्याच्या सीमा ठिकठिकाणी सील केल्या आहेत. ब्रह्मगिरी फेरीही रद्द करून फेरीमार्गावरील पेगलवाडी, पहिणे, गौतमऋषी, सापगाव आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अशा बंद काळात श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भाविकांअभावी त्र्यंबकनगरीत शुकशुकाट दिसून आला.-----------------श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार म्हणजे भाविकांना जणू एक प्रकारची पर्वणीच असते. त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. एरव्ही मंदिरात प्रत्यक्ष प्रवेश केल्यानंतर ब्रह्मवृंदांच्या विविध धार्मिक विधींचे मंत्रघोष, मंदिरातील धूपदीप-अगरबत्ती, कपाळाला लावलेला विशिष्ट सुवासाचा अष्टगंध, श्रावणात हमखास आलेली सोनचाफ्याची फुले एक वेगळेच पावित्र्य निर्माण करते. मात्र यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे शहरासह परिसर ओस पडला आहे.एरव्ही पहिल्या सोमवारी जिल्ह्यासह अन्य भागातून पंचवीस हजारांहून अधिक भाविक त्र्यंबकमध्ये दाखल व्हायचे. हा आकडा तिसºया सोमवारी अडीच तीन लाखांपर्यंत पोहोचायचा. त्यात श्रावणातील पूजाविधी आणि भाद्रपदातील श्राद्धविधी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असायचे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टला एक कोटीपर्यंत उत्पन्नाचा लाभ व्हायचा. तसेच पुरोहितवर्ग, पूजा साहित्य, प्रसाद, किराणा व खासगी वाहनचालक आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आठ ते नऊ कोटीपर्यंत उलाढाल व्हायची. ती कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने ठप्प झाल्याचे बोलले जात आहे.-----------------कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनानेच देवस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने परिसर ओस पडला आहे. मंदिरावर संपूर्ण गावाचे अर्थचक्र अवलंबून असते. वास्तविक श्रावण महिन्यात देवाची पूजाकेल्याशिवाय व फुले वाहिल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. दि. ३१ जुलैनंतर कडक नियमावली घालून तसेच फिजिकल डिस्टन्सिंग राखून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी.- गिरीश जोशीपुरोहित, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरत्र्यंबक नगर परिषदेच्या गाळ्यांमध्ये प्रसादी वाणाचे दुकान आहे. आमचा व्यवसाय येणाºया यात्रेकरूंवर अवलंबून असतो. जेवढी जास्त गर्दी तेवढा जास्त व्यवसाय होत असतो. मात्र चार महिन्यांपासून दुकान बंद असल्याने हजारो रु पयांचे उत्पन्न बुडाले. श्रावण महिन्यात त्र्यंबकला येण्यास बंदी असल्याने मोठे नुकसान झाले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.- नारायण सोनवणेप्रसाद व्यावसायिक

टॅग्स :Nashikनाशिक