शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नाशकात नवसाला पावणाऱ्या दाजिबा विरांची पारंपरिक मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 18:40 IST

दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.

ठळक मुद्देनाशकता दाजिबा विरांची मिरवणूक मिरवणुकीला दीडशे वर्षांहून अधिकची वर्षांची परंपरा

नाशिक : दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.दाजीबा वीर मिरवणूक शुक्रवारी धुळवडच्या दिवशी बुधवार पेठेतून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. तत्पूर्वी, होळी पौर्णिमेच्या रात्री तळेगाव जानोरी (ता. दिंडोरी) येथे दाजीबा वीराची पारंपरिक पूजा क रून वीर नाशिकमध्ये आणण्यात आले.

दुपारी दोनच्या सुमारास जुने नाशिक येथील बुधवार पेठेतून दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणुकीची सुरवात यंदाही बुधवार पेठेतून झाली. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढल्याने परिसरात प्रसन्न वातावरण होते.

ही मिरवणूक काजीपुरा, डिंगरअळी, टाकसाळ गल्ली, भद्रकाली, तेली गल्ली, रविवार कारंजा, रामकुंड येथे पूजा करून पुन्हा दाजीबा वीर मिरवणुकीचा बुधवार पेठेत समारोप झाला.

वीरांनी वेधले लक्षदाजीबा वीराची आस्था सर्व भाविकांत मोठया प्रमाणात असल्याने भाविक मिरवणूक मार्गात दाजीबा वीर बघण्यासाठी गर्दी करत असतात. रामकुंड परिसरात दाजीबा वीर मिरवणूक येत असल्याने शहरातील विविध भागांतील भाविक याठिकाणी येत वीरासह अन्य वीराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले. दाजीबा वीर मिरवणुकीसाठी दर वर्षी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पोलिसांतर्फे ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता.

वीर नाचवण्याची अनोखी परंपराराज्यभरात धुळवडीचा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी रंगांची उधळणही होते. पंरंतु, नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी विरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. वेगवेगळ्या देव देवतांचे मुखवटे धारण करून हे विर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या विरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजिबा विर मिरवणूक दुपारनंतर निघते. सुमारे दिडशे वर्षापासून गवळी घराण्याकडे या परंपरेचा मान आहे. शहरातून निघणारा हा दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच या नवसाला पावणा:या दाजिबा विराच्या दर्शनासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक