शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

अकरावी प्रवेशासाठी आॅक्टोबरपर्यंत चालणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:21 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता अकरावीची प्रवेशप्रक्रिया १ आॅक्टोबरपर्यंच चालणार असून, त्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहे.अकरावी प्रवेशप्र्रक्रियेची एक बायफोकल फेरी, तीन नियमित फेºया, एक विशेष फेरी, तर दोन प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण सात फेºया पार पडल्या आहेत. मात्र तहीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य ही विशेष फेरी सुरू केली असून, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे.शिक्षण विभागाने प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य पद्धतीने तिसरी आणि एकूण फेºयामध्ये आठव्या फेरी सोमवारपासून (दि.२३) प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून, ही फेरी १ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेरीत प्रवेश मिळणाºया विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी कमी दिवस मिळणार असल्याने अशा विद्यार्थ्यांसासाठी विशेष तासिका घ्याव्या, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दहावीची नियमित परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आता फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. कमी टक्केवारी आणि अभ्यासक्रम अर्धा पूर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अनेक महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहे.दरम्यान, यापूर्वीच्या फेरीत प्रवेश मिळालेल्या परंतु महाविद्यालय बदलू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही सोमवारी संकेतस्थळावरून प्रवेश रद्द करण्याची संधी देण्यात आली होती, तर प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येईल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी