शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:29 IST

नाशिकमध्ये साहित्य संमेलन का व्हावे? शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन ...

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़ त्यानंतर सुमारे ६३ वर्षांनंतर २००५ मध्ये जानेवारी महिन्यात शिक्षण कर्मयोगी स्व़ वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़अशा दोन मोठ्या साहित्य संमेलनाचा अनुभव नाशिककरांना आहे़ यावर्षी सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथे जाऊन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना निवेदन दिले आहे़ संमेलनाच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाणा-या संमेलनाला मुळ उद्दिष्टांकडे आणणे हा मुख्य हेतू असावा़ तसेच संमेलन केवळ खर्च, व्यवस्था, निमंत्रणे, अनुदान, राजकारण यासाठी न गाजता साहित्यिक योगदानांसाठी गाजवीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी प्रचार आणि प्रसारासाठी गाजावे हा हेतू असावा. कारण साहित्य संमेलन ही रसिकांसाठी पर्वणी असते़संमेलनातून सादर होणाºया निमंत्रितांच्या नवोदितांच्या कविता तसेच साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण माध्यमे यांच्या स्थित्यंतरांबद्दल होणारे परिसंवाद, चर्चासत्रे साहित्यास सतत चैतन्यमय ठेवून विचार प्रवृत्त करतात़ त्याचप्रमाणे लेखकांच्या मुलाखती, अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ प्रदर्शने यातून नवे लेखक-कवी घडावेत हा संमेलनाचा उद्देश असतो़ त्यामुळे या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे़सावानातील माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना तसेच सावानाशी निगडीत अनेक शैक्षणिक साहित्य, वाद्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचा पूर्वीच्या साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग होता़ आगामी काळात साहित्य संमेलन आल्यास तसाच सहभाग राहील़ नाशिक हे ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक शहर असून, येथे साहित्य, कला, शिक्षण आदी विधायक उपक्रम होतात़ तसेच विचारांचे आदान-प्रदान होते़ नाशिकमध्ये पुन्हा एकदा साहित्यिक वातावरण व्हावे, ग्रंथोत्सव, भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, असे वाटते़- वेदश्री थिगळेसमाज व राज्यश्रयाची साथ घेऊन साहित्य संमेलन यशस्वी होते़ त्यातून साहित्याचा विकास होतो़ ग्रंथाची आरास दिसते, वैचारिक चर्चा घडते़ लेखक, वाचक, प्रकाशक, समीक्षक, संशोधक आणि अध्यक्षीय मनोगत यांच्या सन्मानासाठी साहित्य संमेलनासाठी साहित्य संमेलन व्हावे मुख्य म्हणजे साहित्य संमेलनाची स्मरणिका ही स्थित्यंतराचा दस्तऐवज आणि पुरावा असतो़ त्यामुळे वाचक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणारी स्मरणिका जपून ठेवतात़

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक